शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

खंडित वीजपुरवठ्याने संताप

By admin | Updated: March 4, 2017 00:33 IST

सिन्नर: यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे.

 सिन्नर : गेल्या सहा ते सात वर्षापासून लागोपाठ पडलेल्या दुष्काळाने सिन्नर तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी होरपळला असताना यावर्षी पर्जन्यमान  चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत असून, डोळ्यादेखत पिके करपून जाण्याची वेळ आहे. या पार्श्वभूमीवर सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज आल्यानंतर एकाच वेळी अनेक वीजपंप सुरू होतात. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रकार होत आहेत. एकाच परिसरातील एका वेळी १० ते १५ वेळेस रोहित्र जळण्याचे प्रकार घडले आहेत. जळालेल्या रोहित्राचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास आठ दिवस पोहोचत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये तारतंत्री नसल्याने या गावांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, योगीता कांदळकर, तातू जगताप, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांनी वीज वितरण कंपनीचे सिन्नर येथील अभियंता विनायक इंगळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मिठसागरे ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब कांदळकर, बाळासाहेब साळुंके, भानुदास घुगे, प्रकाश आव्हाड, किरण बलक, रोशन गोळेसर, संदीप लोणारे, सुनील रानडे, सुकदेव गडाख, रमेश गवळी, लक्ष्मण कुंभार, अनिल घुमरे, शिवाजी तळेकर, रवींद्र गिते, जयराम थोरात, चंद्रभान थोरात, शरद गव्हाणे, योगेश घोटेकर, नारायण सापनर, भागवत सापनर, राजाराम घुमरे, दिलीप घुमरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)