शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यकर्म, श्राद्धविधी करता येतील स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:50 IST

नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपंचांगकर्त्यांचा दावा । कोरोना संकटामुळे अनेकांना धार्मिक विधी करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउनही घोषित केले आहे. या संकटकाळात सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद ठेवली आहेत. शिवाय धार्मिक विधीही थांबविण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, त्रिपिंडीसारखे विधी स्थगित करण्यात आले आहेत तर नाशिकला रामकुंडावर दशक्रि या विधीसह अन्य विधीसाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक असेल तरच विधी होत आहेत. पण त्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संचारबंदीमुळे सर्व खासगी वाहने, बसेस यांना रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा वेळी कुणाच्या कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याच्या अंत्यविधीनंतर अंत्यकर्म आणि श्राद्धविधी करण्यात अडचणी येत आहेत. अस्थिविसर्जनासाठीही रामकुंडावर पोहचणे अनेकांना अवघड होऊन बसले आहे. अशा आपतकालीन परिस्थितीत अंत्यकर्म आणि श्राद्ध विधी सवडीनुसार नंतरही करता येतील, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे.सप्तशती पाठकोरोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वत्र पूजा-पाठ, प्रार्थना केल्या जात आहेत. नाशिक येथील रामकुंडाजवळील गंगा-गोदावरी मंदिरात पुरोहित संघातर्फे सप्तशती पाठ सुरू आहेत. अतुलशास्री गायधनी हे पाठ वाचन करत आहेत.सध्याचे संकट असलेले वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तरी सर्व अस्थि विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधि करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत आणि त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा ११व्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक ११व्या दिवशी संपते; त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यानंतर करता येईल. तसेच प्रथम वर्षश्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावास्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथमवर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्र संमत आहे- मोहन दाते,दाते पंचांगकर्ते, सोलापूर

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी