शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अंत्यकर्म, श्राद्धविधी करता येतील स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:50 IST

नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपंचांगकर्त्यांचा दावा । कोरोना संकटामुळे अनेकांना धार्मिक विधी करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउनही घोषित केले आहे. या संकटकाळात सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद ठेवली आहेत. शिवाय धार्मिक विधीही थांबविण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, त्रिपिंडीसारखे विधी स्थगित करण्यात आले आहेत तर नाशिकला रामकुंडावर दशक्रि या विधीसह अन्य विधीसाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक असेल तरच विधी होत आहेत. पण त्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संचारबंदीमुळे सर्व खासगी वाहने, बसेस यांना रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा वेळी कुणाच्या कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याच्या अंत्यविधीनंतर अंत्यकर्म आणि श्राद्धविधी करण्यात अडचणी येत आहेत. अस्थिविसर्जनासाठीही रामकुंडावर पोहचणे अनेकांना अवघड होऊन बसले आहे. अशा आपतकालीन परिस्थितीत अंत्यकर्म आणि श्राद्ध विधी सवडीनुसार नंतरही करता येतील, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे.सप्तशती पाठकोरोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वत्र पूजा-पाठ, प्रार्थना केल्या जात आहेत. नाशिक येथील रामकुंडाजवळील गंगा-गोदावरी मंदिरात पुरोहित संघातर्फे सप्तशती पाठ सुरू आहेत. अतुलशास्री गायधनी हे पाठ वाचन करत आहेत.सध्याचे संकट असलेले वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तरी सर्व अस्थि विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधि करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत आणि त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा ११व्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक ११व्या दिवशी संपते; त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यानंतर करता येईल. तसेच प्रथम वर्षश्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावास्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथमवर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्र संमत आहे- मोहन दाते,दाते पंचांगकर्ते, सोलापूर

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी