शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फळवीरवाडी,चौराईवाडी पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:40 IST

धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकतआहेत.

सर्वतिर्थ टाकेद:धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकतआहेत. पाण्यासाठी आपला रोजगार बुडवून उपाशी पोटी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. आदिवासी बांधवापुढे रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा असतांनाच त्यात प्रत्येक दिवस भर उन्हांत पाण्याच्या शोधात घालवावा लागतो आहे. दहा वर्षे मागील ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या काळात अडसरे गावांसह आमच्या चौराईवाडी,फळवीरवाडी या दोन्ही आदिवासी ठाकूर वाड्यांना पाण्याच्या टाकी सह नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. कागदोपत्री ही योजना पूर्ण आहे व योजनेचा मंजूर निधी खर्च झाला आहे.कागदोपत्री ही योजना पूर्ण असल्याने या वाड्यांमध्ये पाणी पोहचले असे दाखवत आहे केवळ योजना पूर्ण दाखवत असल्याने आमच्या या दोन्ही वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर आजपर्यंत कधीही आला नाही.व प्रत्यक्षात ही योजना राबविली गेलेली नाही. या दोनही वाड्यांमध्ये बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आजही आकाशाखाली कोरड्याठाक पडलेल्या आहेत.आमच्या वाड्यांमध्ये पाण्याची पाईपलाईन सुद्धा नाही.मागच्या वर्षी फळवीर वाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील बालकांना पिण्यासाठी येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून व सहभागातून पाण्याची पाईपलाईन केली व ती पाईपलाईन सुद्धा सध्या फुटलेली आहे तिच्याकडे सुद्धा आजपर्यंत कोणीहीबघितले नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे/.अशी मोठी समस्या असतांना आजही आमच्या महिला माता भगिणींना दूषित पाण्यासाठी मैलोनमैल संघर्ष करावा लागत आहे.रात्री बेरात्री अंधारात खासगी मालकीच्या विहिरितून पिण्यासाठी गढूळ दूषित पाणी चोरून आणावे लागत आहे. सध्या विद्यमान ग्रामपंचायत ने दिलेला हातपंप व येथील विहिरींनीही तळ गाठला असल्याने मुक्या इथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने मुक्या प्राण्यांचा शेळ्यांमेंढ्या गुरे वासरांचा जीव धोक्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून तब्बल सत्तर वर्ष झालीत आण िएकविसाव्या शतकातील ििडजटल आण िपारदर्शक महासत्ता बनू पाहणार्या देशात ग्रामीण आदिवासी भागातील महिलांची दररोज होणारी पाण्यासाठीची भटकंती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. केवळ वेळोवेळी विद्यमान सरपंचांना व ग्रामपंचायत कार्यकारिणीतील व्यक्तींना हा पाणी प्रश्न प्रत्येक वर्षी वेळोवेळी कळऊनही त्यांनी आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केले आहे.असा सवाल या आदिवासी बांधवांनकडून केला जात आहे.सदर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनकडुनही या केवळ कागदोपत्री राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा खुलासा करण्याचा पत्रव्यवहार चालू आहे असे उत्तर दिले जाते व जुन्या ग्रामपंचायत कार्यकारिणीतील हा गोंधळ व कागदोपत्री योजना राबवली आहे प्रत्यक्षात ही योजना राबविली गेलेली नसल्याने आम्ही सुद्धा पाण्याचा टँकर या वाडीत पाठवायला अपयशी ठरल आहोत असे या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकार्यांकडून बोलले जात आहे.तरी या पाणी प्रश्न स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा व जुन्या केवळ कागदोपत्री पूर्ण असलेल्या व राबवलेल्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करून आमच्या अशिक्षति अडाणीपणाचा फायदा घेणार्या दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व आमच्या वाड्यांना पाईपलाईन सह पिण्याचे पाणी पुरवावे अन्यथा आमच्या या सातशे लोकसंख्या असलेल्या दोनही वाडी वस्त्यांमधील ग्रामस्थानकडून इगतपुरी येथे तीव्र हंडा मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी धोंडू का तोरे, हिरामण कातोरे,कोंडाबाई का तोरे,बकूबाई कातोरे,जमनाबाई कातोरे,आदींदाह येथील बहुसंख्य ग्रामस्थांनकडून व अशिक्षति आदिवासी बांधवांनकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई