शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

शेतकऱ्यांचा भरउन्हात मोर्चा

By admin | Updated: March 24, 2017 23:15 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास विरोध असून, शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भरउन्हात मोर्चा काढला.

घोटी : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे गावापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भरउन्हात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढून प्रांत आधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले.  मोर्चात शासन विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत कार्याध्यक्ष राजू देसले, कचरू पाटील डुकरे, भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, अ‍ॅड. दामोदर पागेरे, पंचायत समिती उपसभापती कल्पना हिंदोळे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख निवृत्ती जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, मनसे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम आदि सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपसभापती भगवान आडोळे, ज्येष्ठ नेते निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, कचरू डुकरे, अ‍ॅड. दामोदर पागेरे, भास्कर शिंदे, मच्छिंद्र भगत, भागवत गुंजाळ, संदीप गुंजाळ, नानाजी भोसले, संदीप पागेरे, नामदेव राक्षे, भिकन भटाटे, महादेव आडोळे, शशिकांत आव्हाड, सूर्यकांत भागडे, नंदलाल भागडे, भागाजी उघडे, दौलत बोंडे, विष्णू शिंदे, रामदास बांडे, मनोहर आडोळे, संपत डावखर, हरिष भागडे, जगन गिते, रामचंद्र गव्हाणे, सोमनाथ दुभाषे, शहाजी पवार, रवि काळे, बंडू सुरू डे यांच्यासह शेकडो शेतकरीवर्ग सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने या आंदोलनाला मात्र पोलिसांचे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांवर अन्याय होणारइगतपुरी तालुक्यातील एकूण ८२,८१२ हेक्टरपैकी यापूर्वीच वनक्षेत्राकरिता २१,८४६ हेक्टर, धरणांसाठी १२,७५३ हेक्टर, लष्करी सरावाकरिता १२ हजार हेक्टर, राष्ट्रीय महामार्गसाठी ३१५० हेक्टर, रेल्वेसाठी ३०० हेक्टर, पेट्रोल पाइपलाइनसाठी १४५ हेक्टर, औद्योगिक क्षेत्रासाठी १२५० हेक्टर, अन्य छोटे रस्ते, छोटी गावे, लहान मोठे तलाव यासाठी ३०० हेक्टर जमीन शासनाने संपादित केलेली आहे. आता प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी ४५० हेक्टर व कृषी विकास केंद्रासाठी १४०० हेक्टर जमिनी दिल्यास एकूण ५६७४४ हेक्टर जमीन होते. यामुळे शिल्लक फक्त २६०६८ हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने प्रस्तावित केलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व कृषी विकास केंद्र तालुक्यातील तळेगाव ते पिंपळगाव डुकरा या दरम्यान असलेल्या एकूण २२ गावांतून जाणार असून, परिणामी तालुक्यातील शेतकरी पूर्णत: देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही. प्रस्तावित महामार्ग व कृषी विकास केंद्रे रद्द व्हावे, अशी एकमुखाने विरोधाची भूमिका तालुक्यातील २२ गावांतील बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सध्या शासनाने सुरू केलेले सदर प्रकल्पाचे मोजणीचे व भूसंपादनासंबंधीचे सर्व कामे तत्काळ थांबविण्यात यावे. शासनाने जबरदस्तीने शेतजमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील २२ गावांतील हजारो शेतकरी सामुदायिक आत्महत्त्या केल्याशिवाय राहणार नाही. या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील.