शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आदिवासी भवनावर मोर्चा

By admin | Updated: December 8, 2015 22:41 IST

संघर्ष समिती : पारधी समाजाला लाभ देण्याची केली मागणी

नाशिक : शहर व परिसरातील आदिवासी पारधी संवर्गातील वंचित लाभार्थ्यांना मंजूर असलेले कर्ज तसेच लाभ देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि.८) महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागातील समस्या व मनमानी कारभारावरून आदिवासी संघर्ष परिषदेच्या वतीने आदिवासी विकास विभागावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही संघटनांनी एकाच वेळी व एकाच ठिकाणी मोर्चा व निदर्शने केली. याबाबत भटक्या व विमुक्त जाती संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी पारधी संवर्गातील प्रलंबित असलेले व मंजूर असलेल्या प्रकरणांना गेल्या तीन वर्षांपासून अनुदान मिळत नसून तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली ही कर्ज प्रकरणे न्यूक्लिअर निधीतून अदा करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. भटक्या व विमुक्त जातीसंघाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही आदिवासी कार्यालयातून सर्वेक्षणाची कार्यवाही झालेली आहे. सिंहस्थ काळात हे अनुदान मिळण्याची शक्यता होती, परंतु या ना त्या कारणाने न्यूक्लिअर निधीतून अनुदान प्राप्त झालेले नाही. पारधी समाजाला मंजूर अनुदान व कर्ज मिळत नसल्याने समाजात नैराश्य आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटिल समस्या झाला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून हे अनुदान तत्काळ वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाचे पदाधिकारी निदर्शनात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे आदिवासी संघर्ष परिषदेच्या वतीनेही आदिवासी विकास आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात राजेश गायकवाड, अर्जुन गांगुर्डे, अवधूत धोमोडे, विशाल जाधव, कृष्णा मोरे, बाळासाहेब जाधव, प्रभाकर फसाळे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)विविध मागण्या : अधिकाऱ्यांविषयी तक्रारीआदिवासी विकास विभागात वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या व प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात, वसतिगृह प्रवेशात स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, आश्रमशाळा व वसतिगृहावर कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना श्रेणीनिहाय गणवेशाचा रंग ठरवून देण्यात यावा, रोजंदारी कर्मचारी नियुक्त करताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी मर्जीतील व्यक्तींची करण्यात आलेली भरती रद्द करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.