शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नाशिक शहरात शुक्रवारची नमाज आटोपशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:32 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘

ठळक मुद्देसामुहिकरित्या टॉवेलचा वापर होऊ नये म्हणून मशिदीत टॉवेल ठेवण्यात आले नव्हते.दुवा पठणाचाही वेळ कमी करण्यात आल्याने नमाजपठण लवकर संपले.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद म्हणून शुक्रवारी शहरातील मुस्लिम धर्मियांनी नमाज आटोपशीर घेतली. त्याच बरोबर धर्मगुरूंचे प्रवचनाचा वेळही कमी करण्यात येवून प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘जुम्मा’च्या नमाजला विशेष महत्त्व असल्याने होणारी गर्दी विचारात घेता नमाजपठणाचा अवधी कमी करण्यात आला. कुराणातील लहान सुरहांचे (श्लोक) पठण यावेळी करण्यात आले. शिवाय धर्मगुरुंच्या प्रवचनाची वेळ देखील कमी करण्यात आली. त्यामुळे एरवीपेक्षा वीस ते पंचवीस मिनिटे नमाजपठण लवकर संपले. नमाजापूर्वी शुचिर्भूत (वजू) झाल्यानंतर सामुहिकरित्या टॉवेलचा वापर होऊ नये म्हणून मशिदीत टॉवेल ठेवण्यात आले नव्हते. प्रत्येकाने आपापले स्वतंत्र टॉवेल आणण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. यानुसार मुस्लिम बांधवांनी वजुखान्यात वैयक्तिक टॉवेल वापरले. प्रत्येक नमाज पठणापूर्वी वजुखान्यात तोंड, हात-पाय धुवून मशिदीत प्रवेश केला जातो. यावेळी सामुहिक टॉवेल वापरण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या संसगार्मुळे यंदा सामुहिक टॉवेल बंदी करण्यात आली. तसेच नमाज पठणापूर्वी प्रत्येक मशिदीत डेटॉलने स्वच्छता करण्यात आली. यावेळी दुवा पठणाचाही वेळ कमी करण्यात आल्याने नमाजपठण लवकर संपले. पुढील टप्प्यात शहरातल्या लहान-मोठ्या मशिदींमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये होणाऱ्या पाचवेळा नमाजपठणाचाही कालावधी कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इस्लामच्या शिकवणीनुसार तुम्ही अंत:करणाने आणि शरीराने स्वच्छ असतात, तेव्हा तुमची उपासना साध्य होते. सध्या करोना विषाणू संसगार्चा प्रादूर्भाव वाढल्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष देणे आवश्यक असून, आरोग्याच्या संदर्भात तक्रारी जाणविल्यास खबरदारी घ्यावी. तसेच निरामय आरोग्यासाठी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुस्लिम धर्मगुरुंनी 'जुम्मा'च्या नमाजपठणानंतरच्या प्रवचनात केले.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक