औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:18 AM2021-07-22T00:18:11+5:302021-07-22T01:13:36+5:30

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Frequent light bulbs in industrial estates | औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा उद्योगांवर परिणाम

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील श्री समर्थ औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र फीडर टाकणार असल्याचे वर्षांपासून आश्वासन देत आहे, मात्र अजूनही त्याची पूर्ती नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजक एकत्रपणे महावितरण विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी दिली. पिंपळगावच्या औद्योगिक क्षेत्रात स्टील रोलिंग मिल, प्लॅस्टिक मोल्डिंग उद्योग, फूड इंडस्ट्री, फार्मसिटिकल आदी सातत्याने प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात असून व या उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
महावितरणने मागील काही दिवसांपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा दावा केला, मात्र सध्या वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. तसेच, ट्रान्सफॉर्मर बसवणे किंवा तांत्रिक कारण अथवा नैसर्गिकरीत्या होणाऱ्या ४८ तासांच्या शटडाऊनलाही औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नेहमी सहकार्य करतात.

मात्र नुकसान टाळण्यासाठी नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली जाते, तेव्हा महावितरण कंपनी सहकार्य करत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजकांना त्याचा फटका बसत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी पिंपळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक महावितरण कंपनीवर धडक मोर्चा नेणार असल्याचे समर्थ औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीला स्वतःचा फीडर हवा आहे. कारण पिंपळगाव सबस्टेशनमधील फीडर पिंपळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सतत ओव्हर लोडिंग होऊन फीडर ट्रिप होतो. यासाठी महावितरणने पिंपळगाव औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र फीडर देऊन औद्योगिक ग्राहकांची मुख्य अडचण दूर करावी.
- सुधाकर कापडी, संचालक, पिंपळगाव बसवंत, एमआयडीसी

पिंपळगाव औद्योगिक वसाहतीमधून महावितरण कंपनीला कोट्यवधींची वसुली होत असते. तरीही महावितरण कंपनी सुरळीतपणे वीजपुरवठा देत नाही. प्रत्येकी दोन तासाला वीजपुरवठा खंडित करते, त्यामुळे उद्योजकांचे लाखो रुपयांचे दररोज नुकसान होत आहे. कंपनीने वेळेत वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उद्योजक रस्त्यावर उतरतील.
- अरुण काळे, व्यवस्थापक, औद्योगिक वसाहत, पिंपळगाव बसवंत

वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने समर्थ औद्योगिक वसाहतीत सुरळीतपणे वीजपुरवठा केला नाही तर नाइलाजाने आम्हाला युनिट बंद करावे लागेल. परिणामी वसाहतीतील प्रगती खंडित होईल त्यामुळे योग्य दखल घ्यावी.
- रमेश बोरस्ते, संचालक, बोरस्ते ॲग्रो.

Web Title: Frequent light bulbs in industrial estates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.