शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:23 IST

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ...

ठळक मुद्देवणी पोलिसात गुन्हा दाखल; श्रमजीवीने मुक्त केले द्राक्षबागेतील वेठबिगार

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठाणगाव (सुरगाणा) येथील मजुरांची वणी (दिंडोरी) येथील द्राक्ष बागायतदार मालकाच्या सात वर्षाच्या गुलामगिरीतुन सुटका केली आहे.जऊळके येथील बागायतदार मालक राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे अत्यल्प मजुरीत वेठबिगार असलेल्या तुकाराम गावित या मजुराची पत्नी मुलांसह सुटका करत मालकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली. तुकाराम पांडू गावित (३३) यांच्या गावातील यशवंत नामदेव ठाकरे हा जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे द्राक्षबागेत कामाला होता. यशवंतच्या ओळखीने तुकारामला पाटील यांनी ५० हजार रुपये आगाऊ दिले. घराचे काम आटोपून तुकाराम दोन महिन्यानंतर जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या द्राक्षबागेत कामासाठी आपले बिºहाड घेऊन दि. ६ जून २०१३ रोजी गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम आणि त्याची पत्नी दोघेही बागेत काम करू लागले. सुरुवातीला कामाचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये व तीन पोते बाजरी वर्षाला देता येईल, असे सांगितले. गेले म्हणजे केवळ ६८ रुपये दिवस मजुरी आणि तुकारामाच्या पत्नीला ७० रुपये मजुरी मालक देत होता. त्या बदल्यात हे दोघे रोज सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बागेचे काम करत होते. त्यानंतरसात वर्षात ही मजुरी वार्षिक४५ हजारपर्यंत पोहचली.महिन्याला अवघी १२३ रुपये मजुरी, बदल्यात अधिक काम करून घेतले गेले. याला कंटाळून त्यांनी श्रमजीवी संघटनेकडे धाव घेऊन न्याय मिळविला.मालकाचा जाचवणी येथील मालकाकडे जेव्हा तुकाराम हिशेब सांगत असे तेव्हा मालक तुकारामाच्या अंगावरच २० ते २५ हजार उलट शिल्लक असल्याचे सांगत होता. या जाचाला कंटाळून तुकारामने परवडत नसल्याचे सांगितले तेव्हा मालकाने तुकारामच्या अंगावरच १ लाख ५३ हजार ३०० रु पये बाकी असल्याचे सांगत ती फेड आणि मगच जा, असे सांगत त्याच्या पत्नीला बंधक बनवून राबवत ठेवले.कार्यकर्त्यांचे प्रसंगावधानश्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे या कुटुंबाची सुटका झाली. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या वेठबिगार मुक्तीच्या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, मुरलीधर कनोज, राजू राऊत, हिरामण कडाळी यांनी सततचा पाठपुरावा करत कुटुंबाच्या माथी मारलेला गुलामगिरीचा डाग यशस्वीपणे पुसून काढला आहे.

असहायतेचा गैरफायदागरिबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे श्रम विकत घेऊन त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रकार सध्या ठिकठिकाणी श्रमजीवी संघटना उघड करत आहे. याच गावातील मजुरांना श्रमनजीवीने मुक्त केलेले असल्याने कार्यकर्त्यांकडे न्यायाच्या अपेक्षेने तुकारामने संपर्क केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेने आणि विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनीदेखील तातडीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस