शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:23 IST

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ...

ठळक मुद्देवणी पोलिसात गुन्हा दाखल; श्रमजीवीने मुक्त केले द्राक्षबागेतील वेठबिगार

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठाणगाव (सुरगाणा) येथील मजुरांची वणी (दिंडोरी) येथील द्राक्ष बागायतदार मालकाच्या सात वर्षाच्या गुलामगिरीतुन सुटका केली आहे.जऊळके येथील बागायतदार मालक राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे अत्यल्प मजुरीत वेठबिगार असलेल्या तुकाराम गावित या मजुराची पत्नी मुलांसह सुटका करत मालकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली. तुकाराम पांडू गावित (३३) यांच्या गावातील यशवंत नामदेव ठाकरे हा जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे द्राक्षबागेत कामाला होता. यशवंतच्या ओळखीने तुकारामला पाटील यांनी ५० हजार रुपये आगाऊ दिले. घराचे काम आटोपून तुकाराम दोन महिन्यानंतर जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या द्राक्षबागेत कामासाठी आपले बिºहाड घेऊन दि. ६ जून २०१३ रोजी गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम आणि त्याची पत्नी दोघेही बागेत काम करू लागले. सुरुवातीला कामाचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये व तीन पोते बाजरी वर्षाला देता येईल, असे सांगितले. गेले म्हणजे केवळ ६८ रुपये दिवस मजुरी आणि तुकारामाच्या पत्नीला ७० रुपये मजुरी मालक देत होता. त्या बदल्यात हे दोघे रोज सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बागेचे काम करत होते. त्यानंतरसात वर्षात ही मजुरी वार्षिक४५ हजारपर्यंत पोहचली.महिन्याला अवघी १२३ रुपये मजुरी, बदल्यात अधिक काम करून घेतले गेले. याला कंटाळून त्यांनी श्रमजीवी संघटनेकडे धाव घेऊन न्याय मिळविला.मालकाचा जाचवणी येथील मालकाकडे जेव्हा तुकाराम हिशेब सांगत असे तेव्हा मालक तुकारामाच्या अंगावरच २० ते २५ हजार उलट शिल्लक असल्याचे सांगत होता. या जाचाला कंटाळून तुकारामने परवडत नसल्याचे सांगितले तेव्हा मालकाने तुकारामच्या अंगावरच १ लाख ५३ हजार ३०० रु पये बाकी असल्याचे सांगत ती फेड आणि मगच जा, असे सांगत त्याच्या पत्नीला बंधक बनवून राबवत ठेवले.कार्यकर्त्यांचे प्रसंगावधानश्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे या कुटुंबाची सुटका झाली. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या वेठबिगार मुक्तीच्या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, मुरलीधर कनोज, राजू राऊत, हिरामण कडाळी यांनी सततचा पाठपुरावा करत कुटुंबाच्या माथी मारलेला गुलामगिरीचा डाग यशस्वीपणे पुसून काढला आहे.

असहायतेचा गैरफायदागरिबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे श्रम विकत घेऊन त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रकार सध्या ठिकठिकाणी श्रमजीवी संघटना उघड करत आहे. याच गावातील मजुरांना श्रमनजीवीने मुक्त केलेले असल्याने कार्यकर्त्यांकडे न्यायाच्या अपेक्षेने तुकारामने संपर्क केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेने आणि विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनीदेखील तातडीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस