शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:23 IST

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ...

ठळक मुद्देवणी पोलिसात गुन्हा दाखल; श्रमजीवीने मुक्त केले द्राक्षबागेतील वेठबिगार

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठाणगाव (सुरगाणा) येथील मजुरांची वणी (दिंडोरी) येथील द्राक्ष बागायतदार मालकाच्या सात वर्षाच्या गुलामगिरीतुन सुटका केली आहे.जऊळके येथील बागायतदार मालक राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे अत्यल्प मजुरीत वेठबिगार असलेल्या तुकाराम गावित या मजुराची पत्नी मुलांसह सुटका करत मालकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली. तुकाराम पांडू गावित (३३) यांच्या गावातील यशवंत नामदेव ठाकरे हा जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे द्राक्षबागेत कामाला होता. यशवंतच्या ओळखीने तुकारामला पाटील यांनी ५० हजार रुपये आगाऊ दिले. घराचे काम आटोपून तुकाराम दोन महिन्यानंतर जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या द्राक्षबागेत कामासाठी आपले बिºहाड घेऊन दि. ६ जून २०१३ रोजी गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम आणि त्याची पत्नी दोघेही बागेत काम करू लागले. सुरुवातीला कामाचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये व तीन पोते बाजरी वर्षाला देता येईल, असे सांगितले. गेले म्हणजे केवळ ६८ रुपये दिवस मजुरी आणि तुकारामाच्या पत्नीला ७० रुपये मजुरी मालक देत होता. त्या बदल्यात हे दोघे रोज सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बागेचे काम करत होते. त्यानंतरसात वर्षात ही मजुरी वार्षिक४५ हजारपर्यंत पोहचली.महिन्याला अवघी १२३ रुपये मजुरी, बदल्यात अधिक काम करून घेतले गेले. याला कंटाळून त्यांनी श्रमजीवी संघटनेकडे धाव घेऊन न्याय मिळविला.मालकाचा जाचवणी येथील मालकाकडे जेव्हा तुकाराम हिशेब सांगत असे तेव्हा मालक तुकारामाच्या अंगावरच २० ते २५ हजार उलट शिल्लक असल्याचे सांगत होता. या जाचाला कंटाळून तुकारामने परवडत नसल्याचे सांगितले तेव्हा मालकाने तुकारामच्या अंगावरच १ लाख ५३ हजार ३०० रु पये बाकी असल्याचे सांगत ती फेड आणि मगच जा, असे सांगत त्याच्या पत्नीला बंधक बनवून राबवत ठेवले.कार्यकर्त्यांचे प्रसंगावधानश्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे या कुटुंबाची सुटका झाली. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या वेठबिगार मुक्तीच्या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, मुरलीधर कनोज, राजू राऊत, हिरामण कडाळी यांनी सततचा पाठपुरावा करत कुटुंबाच्या माथी मारलेला गुलामगिरीचा डाग यशस्वीपणे पुसून काढला आहे.

असहायतेचा गैरफायदागरिबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे श्रम विकत घेऊन त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रकार सध्या ठिकठिकाणी श्रमजीवी संघटना उघड करत आहे. याच गावातील मजुरांना श्रमनजीवीने मुक्त केलेले असल्याने कार्यकर्त्यांकडे न्यायाच्या अपेक्षेने तुकारामने संपर्क केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेने आणि विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनीदेखील तातडीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस