शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:00 IST

बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणार आहे. या कामामुळे बागलाणच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणार आहे. या कामामुळे बागलाणच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.  देशात सर्वात उंच आणि अखंड पाषाणात कोरलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने २७५ कोटी रुपयांचे विशेष संपुट जाहीर केले होते. याच्या पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रु पयांचे कामे करून या तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रस्त्याच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासाला ब्रेक लागला होता. शासनाने सकारात्मक प्रतिसाद  देत मूर्तीनिर्माण समितीला आवश्यक जमीन प्रदान केल्यामुळे येथील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. २७५ कोटीच्या मंजूर  निधीपैकी ५८ कोटी निधी खर्च झाला असून, उर्वरित निधीही खर्च करण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. येत्या वर्षभरात या निधीमधून साल्हेर, मुल्हेर, सालोटा हे किल्ले विकासाबरोबरच मूर्तीस्थळ विकास, हरणबारी धरणात बोटिंग, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा योजना व मांगीतुंगीला जोडणाºया सर्व रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे या जैन तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.पर्यटन विकासालाही चालना...शासनाने मांगीतुंगी व परिसर विकासासाठी २७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात मांगीतुंगीला जोडणारे चारही रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यात ताहाराबाद - मांगीतुंगी, साल्हेर - मुल्हेर, मुल्हेर - मांगीतुंगी, अंतापूर - मुल्हेर या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मांगीतुंगी गावासह तीर्थक्षेत्रासाठी थेट हरणबारी धरणामधून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार असून, याच धरणात पर्यटकांसाठी बोटिंग ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील साल्हेर गाव व परिसर दत्तक घेण्याचे जाहीर केले असून, सुमारे २८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते विकास, डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर सर्व मोबाइल कंपन्यांचे मनोरे उभारून सेवा पुरविण्यात येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, मॉडेल स्कूल आणि किल्ले विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक