शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय ...

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंब कार्डधारकांना मोफत धान्यवाटप केेले जात असल्याने रेशन दुकानांसमोर सध्या रांगा लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये भरडधान्यांचे वाटप केेले जात आहे.

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या वतीने मोफत गहू, तांदूळ वाटप केला जात आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून मे महिन्यांसाठी रेशनच्या धान्याचे मोफत वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी २५ किलो गहू प्रतिकार्ड, १० किलो तांदूळ प्रतिकार्ड मोफत वाटप केले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अतिरिक्त मोफत वाटप केले जात आहे.

प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींसाठी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अतिरिक्त तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तसेच एक किलो डाळ याप्रमाणे मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक १,७२,३४८ तर प्राधान्यक्रम कुटुंबातील २८,२५,१३६ सदस्यांना लाभ होत आहे.

--इन्फो--

जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने अनेक ठिकाणी सकाळी ७.३० ते दुपारी ११ वाजेपर्यंतच रेशनची दुकाने सुरू ठेवली जात असल्याने सकाळपासूनच कार्डधारकांच्या रेशन दुकानांसमोर रांगा लागतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत मिळणारे नियमित धान्य मोफत दिले जात असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही मोफतचे धान्य वितरित केले जात असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अन्नधान्याचा आधार झाला आहे.

--इन्फो--

नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गहूऐवजी भरडधान्ये (मका, ज्वारी, बाजरी) यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळ ज्या दुकानात शिल्लक आहे अशा दुकानांमध्ये प्रथम येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थींना डाळींचे वाटप केले जात आहे. त्यानंतर डाळ शिल्लक असली तरी प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींना वाटप करण्यात येत आहे.