शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

लॉकडाऊनमध्ये कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय ...

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंब कार्डधारकांना मोफत धान्यवाटप केेले जात असल्याने रेशन दुकानांसमोर सध्या रांगा लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये भरडधान्यांचे वाटप केेले जात आहे.

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या वतीने मोफत गहू, तांदूळ वाटप केला जात आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून मे महिन्यांसाठी रेशनच्या धान्याचे मोफत वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी २५ किलो गहू प्रतिकार्ड, १० किलो तांदूळ प्रतिकार्ड मोफत वाटप केले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अतिरिक्त मोफत वाटप केले जात आहे.

प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींसाठी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अतिरिक्त तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तसेच एक किलो डाळ याप्रमाणे मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक १,७२,३४८ तर प्राधान्यक्रम कुटुंबातील २८,२५,१३६ सदस्यांना लाभ होत आहे.

--इन्फो--

जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने अनेक ठिकाणी सकाळी ७.३० ते दुपारी ११ वाजेपर्यंतच रेशनची दुकाने सुरू ठेवली जात असल्याने सकाळपासूनच कार्डधारकांच्या रेशन दुकानांसमोर रांगा लागतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत मिळणारे नियमित धान्य मोफत दिले जात असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही मोफतचे धान्य वितरित केले जात असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अन्नधान्याचा आधार झाला आहे.

--इन्फो--

नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गहूऐवजी भरडधान्ये (मका, ज्वारी, बाजरी) यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळ ज्या दुकानात शिल्लक आहे अशा दुकानांमध्ये प्रथम येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थींना डाळींचे वाटप केले जात आहे. त्यानंतर डाळ शिल्लक असली तरी प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींना वाटप करण्यात येत आहे.