शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लॉकडाऊनमध्ये कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय ...

नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंब कार्डधारकांना मोफत धान्यवाटप केेले जात असल्याने रेशन दुकानांसमोर सध्या रांगा लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये भरडधान्यांचे वाटप केेले जात आहे.

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या वतीने मोफत गहू, तांदूळ वाटप केला जात आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून मे महिन्यांसाठी रेशनच्या धान्याचे मोफत वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी २५ किलो गहू प्रतिकार्ड, १० किलो तांदूळ प्रतिकार्ड मोफत वाटप केले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अतिरिक्त मोफत वाटप केले जात आहे.

प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींसाठी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अतिरिक्त तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तसेच एक किलो डाळ याप्रमाणे मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक १,७२,३४८ तर प्राधान्यक्रम कुटुंबातील २८,२५,१३६ सदस्यांना लाभ होत आहे.

--इन्फो--

जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने अनेक ठिकाणी सकाळी ७.३० ते दुपारी ११ वाजेपर्यंतच रेशनची दुकाने सुरू ठेवली जात असल्याने सकाळपासूनच कार्डधारकांच्या रेशन दुकानांसमोर रांगा लागतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत मिळणारे नियमित धान्य मोफत दिले जात असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही मोफतचे धान्य वितरित केले जात असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अन्नधान्याचा आधार झाला आहे.

--इन्फो--

नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गहूऐवजी भरडधान्ये (मका, ज्वारी, बाजरी) यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळ ज्या दुकानात शिल्लक आहे अशा दुकानांमध्ये प्रथम येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थींना डाळींचे वाटप केले जात आहे. त्यानंतर डाळ शिल्लक असली तरी प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींना वाटप करण्यात येत आहे.