शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

देवांग जानी यांचा आरोप : जलसंपदा विभागाचा गोंधळ

नाशिक : जलसंपदा विभागाच्या २०१२च्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च २०१२ मध्ये ३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. आता मार्च २०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या नवीन आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५४ दलघमी पाणीसाठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच २०१२च्या तुलनेत धरणात १८ दलघमी पाणीसाठा जास्तीचा आहे. असे असेल तर मग पाणीकपातीची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित करीत गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी जलसंपदा विभाग पाणीसाठ्याची फसवी आकडेवारी जाहीर करीत नाशिककरांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची क्षमता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार १५९.४२ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) आहे. २००२ मध्ये मेरी संस्थेने गंगापूर धरणाच्या गाळासंदर्भात सर्वेक्षण केले होेते. त्यानुसार गंगापूर धरण १९५४ ला बांधले गेले. त्यावेळी धरणाची साठवणूक क्षमता ४३.७५ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) जमा झाल्या कारणाने २७ टक्केने कमी झाली आहे. तसेच २००३ ते २०१६ या कालावधीत जमा झालेला अतिरिक्त गाळाचा विचार करता ही क्षमता आणखी कमी झाल्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या ४ मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात एकूण क्षमता १५९ दलघमी पैकी उपयुक्त पाणीसाठा ५४ दलघमी (क्षमतेच्या ३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात १९५४च्या धरणाची जलसाठवणूक क्षमता मोजली गेलेली आहे. मेरी या सरकारी संस्थेने २००२च्या केलेल्या सर्वेक्षणानुसार गाळ वजा करून पाणीसाठ्याची आकडेवारी मांडली गेली पाहिजे होती, परंतु सध्याची पाणीसाठ्याची आकडेवारी ही फुगली गेलेली आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन कोटी भाविक पर्वणीच्या काळात येऊन गेले. साधुग्राममध्ये आखाड्यातील महतांचा चार महिन्यांचा पाणीपुरवठा करण्यात आला तो वेगळा. त्यामुळेच गंगापूर धरणात गाळ किती आणि त्याची साठवण क्षमता किती? आजमितीस धरणात नेमका किती पाणीसाठा आहे? याची वस्तुनिष्ठ माहिती नाशिककरांना मिळायला हवी. जलसंपदा विभाग फसवी आकडेवारी देत असल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)