शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

देवांग जानी यांचा आरोप : जलसंपदा विभागाचा गोंधळ

नाशिक : जलसंपदा विभागाच्या २०१२च्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च २०१२ मध्ये ३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. आता मार्च २०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या नवीन आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५४ दलघमी पाणीसाठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच २०१२च्या तुलनेत धरणात १८ दलघमी पाणीसाठा जास्तीचा आहे. असे असेल तर मग पाणीकपातीची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित करीत गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी जलसंपदा विभाग पाणीसाठ्याची फसवी आकडेवारी जाहीर करीत नाशिककरांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची क्षमता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार १५९.४२ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) आहे. २००२ मध्ये मेरी संस्थेने गंगापूर धरणाच्या गाळासंदर्भात सर्वेक्षण केले होेते. त्यानुसार गंगापूर धरण १९५४ ला बांधले गेले. त्यावेळी धरणाची साठवणूक क्षमता ४३.७५ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) जमा झाल्या कारणाने २७ टक्केने कमी झाली आहे. तसेच २००३ ते २०१६ या कालावधीत जमा झालेला अतिरिक्त गाळाचा विचार करता ही क्षमता आणखी कमी झाल्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या ४ मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात एकूण क्षमता १५९ दलघमी पैकी उपयुक्त पाणीसाठा ५४ दलघमी (क्षमतेच्या ३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात १९५४च्या धरणाची जलसाठवणूक क्षमता मोजली गेलेली आहे. मेरी या सरकारी संस्थेने २००२च्या केलेल्या सर्वेक्षणानुसार गाळ वजा करून पाणीसाठ्याची आकडेवारी मांडली गेली पाहिजे होती, परंतु सध्याची पाणीसाठ्याची आकडेवारी ही फुगली गेलेली आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन कोटी भाविक पर्वणीच्या काळात येऊन गेले. साधुग्राममध्ये आखाड्यातील महतांचा चार महिन्यांचा पाणीपुरवठा करण्यात आला तो वेगळा. त्यामुळेच गंगापूर धरणात गाळ किती आणि त्याची साठवण क्षमता किती? आजमितीस धरणात नेमका किती पाणीसाठा आहे? याची वस्तुनिष्ठ माहिती नाशिककरांना मिळायला हवी. जलसंपदा विभाग फसवी आकडेवारी देत असल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)