नाशिक : नाशिककरांचे अस्तित्व असलेल्या गोदावरी नदीला मागील चार वर्षांमध्ये ३ हजार ८५६ नागरिकांनी प्रदूषित केले. या नागरिकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गोदावरीच्याप्रदूषणाला करणीभूत ठरलेल्या बेफिकिर नागरिकांकडून तब्बल ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्येही गोदावरीचे प्रदूषण फारसे नियंत्रणात राहिले नाही. मार्चपासून जुलैपर्यंत ८८ लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत. यानुसार विभागाीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढवा बैठक आॅनलाइन पध्दतीने मंगळवारी (दि.११) घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, मनपा उपायुक्त रघुनाथ गावडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडीत आदींनी सहभाग घेतला.
चार वर्षांत ३ हजार लोकांनी केले गोदामाईला प्रदूषित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 16:38 IST
गोदावरीचे गटारीकरण रोखण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सातत्याने मिसळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
चार वर्षांत ३ हजार लोकांनी केले गोदामाईला प्रदूषित!
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये ८८ लोकांवर गुन्हे८२ हजारांचा दंड वसूल कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार