शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

चार तालुक्यांना अजूनही पावसाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:14 IST

नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली. त्यातही काही ठराविक तालुक्यांमध्ये एक-दोन पाऊस दमदार पडल्याने शेतकºयांनी त्या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने त्यानंतर पाठ फिरविल्याने ७० टक्क्यांवरच पेरण्या

ठळक मुद्देचार तालुक्यांना अजूनही पावसाची गरजखरिपाच्या ९५ टक्के पेरण्या : नाशिकला पावसाचा धोकाचांगला पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ओलांडल्याने खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित ५ टक्के भाताच्या पेरण्या येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असला तरी, नाशिक व निफाड तालुक्यांत झालेला पाऊस व निर्माण झालेली पूरपरिस्थिती शेतकऱ्यांच्या मुळाशी उठण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय बागलाण, नांदगाव, मालेगाव, येवला या तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा असून, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली. त्यातही काही ठराविक तालुक्यांमध्ये एक-दोन पाऊस दमदार पडल्याने शेतकºयांनी त्या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने त्यानंतर पाठ फिरविल्याने ७० टक्क्यांवरच पेरण्या अडकून पडल्या होत्या. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने व ते आजवर कायम राहिल्याने जिल्ह्यातील साडेसहा लाख खरिपाच्या हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाखांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित पेरणी भाताची असून, सध्या पाऊस सुरू असल्याने तीदेखील पूर्ण होणार आहे. पावसाच्या सर्वदूर आगमनाने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त केला जात असला तरी, काही तालुक्यांना अजूनही पावसाची गरज आहे. पावसाअभावी पिकांची पाने पिवळसर पडू लागले आहेत. विशेष करून बागलाण, मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यांत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीखाली पुरेशी ओल तयार न झाल्याने पिकांच्या वाढीवरही त्याचा परिणाम जाणू लागला आहे. या तालुक्यातील पिकांना अजूनही पावसाची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले.नाशिक, निफाड, दिंडोरी या तालुक्यांत सरासरीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला असून, नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला असून, विशेष करून सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग ही पिके खराब होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक