शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

चार धरणांतून विसर्ग : गोदेला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:42 AM

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने तसेच त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा  उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के  साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा  दिला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्णात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.  शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची तिसऱ्या दिवशीही संततधार कायम असून, रविवारी दिवसभर व रात्रीही कोसळलेल्या पावसाने जिल्ह्णातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणात ७५ टक्के जलसाठा झाला असून, भावली धरणही ८० टक्के भरले आहे. गेल्या वर्षीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार कोसळेल्या पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊनही गंगापूर धरणात ७५ टक्के साठा झाला आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या धरण क्षेत्रात सोमवारीही पावसाची हजेरी कायम असल्यामुळे धरणाची खबरदारी म्हणून गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता ३१४४ क्यूसेक तर दारणा धरणामधून ३७२६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले, त्यानंतर दुपारनंतर पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. दारणा व गंगापूरमधून पाणी सोडल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून ७२१० क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले तर चणकापूरमधून ५६७, पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.जिल्ह्णातील अन्य धरणांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा झाला आहे. तर पालखेड समूहात २५ टक्के, वालदेवी ४४ टक्के, कडवा ४२ टक्के, चणकापूर ४५ टक्के, हरणबारी २३ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील सर्व धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला आहे. भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही तिन्ही धरणे कोरडीठाक आहेत.सतर्कतेचा इशाराजिल्ह्णातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच आंघोळीसाठीदेखील मुलांनी नदीत उड्या घेण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात सध्या पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रसंगी धरणाच्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्यामुळे नदीच्या काठालगत असलेल्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :floodपूर