शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सिन्नर-शिर्डी रस्ता होणार चौपदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:45 IST

साईभक्तांचा प्रवास होणार सुकर : राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडून पाहणी

 सिन्नर : सिन्नर- शिर्डी या चौपदरीकरणाला तत्वत: मंजूरी मिळाल्यानंतर या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर ते शिर्डीपर्यंत रस्त्याची पाहणी करुन प्रस्ताव बनविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. सुमारे ६० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे साईभक्तांचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर-शिर्डी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले होते. आता भाजप-सेना शासनाच्या काळात या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर डांबरीकरण व कॉक्रीटीकरण असे ६० किलोमीटर मार्गाच्या खर्चाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.बुधवारी सकाळी खासदार गोडसे, आमदार वाजे यांच्यासह या राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी पी. जी. कोडसकर, अभियंता धनू झोडगे, सुनील पवार यांनी गुरेवाडी बायपासपासून या प्रस्तावित महामार्गाची नकाशानुसार पाहणी करण्यास प्रारंभ केला. गुरेवाडीनंतर मुसळगाव एमआयडीसीत होणाऱ्या फ्लायओव्हर बाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. सुमारे पाचशे मीटर लांबीचे दोन फ्लायओव्हर असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर वडांगळी फाट्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता याठिकाणी अंडरपास करण्यावर चर्चा करण्यात आली. सुमारे ६० किलोमीटरच्या या महामार्गावर दातली, पांगरी, वावी व पाथरे येथे अंडरपास असणार आहेत. पुढे अहमदनगर जिल्ह्णात दर्डे, झगडेफाटा, सावळीविहिरमार्गे आवश्यक त्याठिकाणी अंडरपास बनविऱ्यात येणार आहे. नाशिक-अहमदनगरच्या सरहद्दीवर दर्डे गावाजवळ महामार्गाखालून गोदावरी उजवा कालवा जातो. याठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी रस्ता उचलला जाणार असून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. महामार्गावरील जास्तीत जास्त वळणे दूर करुन रस्ता सरळ करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव केला जात आहे. या ६० किलोमीटरच्या डांबरीकरणाच्या कामासाठी ९५० कोटी रुपये तर कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी १२५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण की कॉक्रीटीकरण हे निश्चित होणार आहे. लवकरच या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळेल असा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)