शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा ...

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने व्हावा यासाठी बसविण्यात आलेल्या सुमारे चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर्सची अवस्था बिकट झाली असून, ते अखेरची घटका मोजत व्हेंटिलेटरवर तग धरून आहेत.

ट्रान्स्फाॅर्मर्समध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज वितरणने झोपेचे सोंग न घेता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाटोदा येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमधून पाटोदा, दहेगाव पाटोदा, ठाणगाव, पिंपरी, निलखेडे, सोमठाणदेश, आंबेगाव, शिरसगाव, वळदगाव, लौकी या गाव व वाड्या-वस्त्यांना वीजपुरवठा केला जात आहे. या भागातील सर्वच वीजवाहिन्या लोंबकळत्या स्थितीत असून अनेक खांबही वाकले आहेत. सर्वच ट्रान्स्फाॅर्मर्सवरील डिस्ट्रिब्युशनपेटीतील फ्यूज फुटलेल्या अवस्थेत असून फ्यूजऐवजी तारा वापरलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..................................................

मनुष्यहानीची भीती :

कोणत्याही ट्रान्स्फाॅर्मरच्या फ्यूजपेटीत एकही फ्यूज नाही. आलेल्या मुख्य वाहिनीलाच तारा जोडून पुढे पुरवठा दिला जात आहे. तसेच बाहेरील बाजूच्या मुख्य केबलवरील प्लॅस्टिक आवरण जळून गेलेल्या स्थितीत असून, संपूर्ण वाहिन्या उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दुर्घटना घडून वित्त व मनुष्यहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

...................................

महावितरणने तत्परता दाखवावी

शेतकरी अथवा सर्वसामान्य ग्राहकाकडे वीजबिल थकले तर महावितरण तत्परता दाखवून कोणतीही पूर्वसूचना न देता वीजजोडणी तोडून वीजपुरवठा खंडित करते, मात्र वीजवाहिन्या, वाकलेले खांब,ट्रान्स्फाॅर्मर,फ्यूज आदींची दुरुस्ती करण्यात महावितरणकडून अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

...................................

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

रोहित्राकडे येणारा वीजवाहिन्यांचा सप्लाय लोंबकळणाऱ्या व फुटलेल्या चिमण्या वारा तसेच पावसामुळे होणारे ब्रेकडाऊन तसेच खांबावरील चिमणी (इन्सुलेटर) फुटल्याने वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डिस्ट्रिब्युशन बॉक्समधील गपमध्ये पावसाचे पाणी शिरताच ते खराब होणे, उघड्या केबलमध्ये पाणी गेल्याने केबल ब्लास्ट होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने बिघाड होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांचे तसेच शेतकऱ्यांचे वीजपंप खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सर्वच रोहित्रांची दुरवस्था झाल्याने नागरिक वारंवार याबाबतची कल्पना अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्गाला देत आले आहेत, मात्र कोणत्याही रोहित्राची दुरुस्ती केली जात नाही. (२६ पाटोदा १/२)

===Photopath===

260521\26nsk_4_26052021_13.jpg

===Caption===

२६ पाटोदा १/२