शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वडाळागावातील चार घरकुले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:54 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

ठळक मुद्देभाडेकरू ठेवले : महापालिकेची कारवाई

लोकमत प्रभावनाशिक : वडाळागाव घरकुल योजनेतील निवासस्थानाचा गैरवापर केला जात असल्याबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे वतीने घरकुल योजनेतील घरांची तपासणी केली असता चार घरकुले मालकांनी भाडेकरूंंना दिल्याचे आढळून आल्याने ही चारही घरे सील करण्याची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यासाठी मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केल्या होत्या. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची तपासणी करून महापालिकेने लाभार्थी निवडले होते व त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरे वाटप केली. मात्र यापैकी काही जणांना घरकुल योजनेची गरज नसतानाही घरे घेतली आहेत. तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. ज्यांना गरज नाही अशा मिळकतधारकांनी घरकुल योजनेतील घरे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला असून, जेव्हा मनपाच्या वतीने घरात लाभार्थी राहतो की नाही तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येतात त्यावेळी त्यांना आधीच माहिती होत असल्याने त्यावेळेस स्वत: लाभार्थी घरी हजर राहतो. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात. अलीकडेच यासंदर्भातील लोकमत वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अचानक वडाळागावातील घरकुल योजनेत जाऊन सदर घरकुलांमध्ये मालक राहतो की भाडेकरू याची तपासणी केली असता चार घरांमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत. अशा घरांचा पंचनामा करून सील करण्यात आले आहे. सदर मोहीम कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे ५० टक्के घरे संबंधित लाभार्थ्यांनी भाडेतत्त्वावर दिली असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्याठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका