शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

वडाळागावातील चार घरकुले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:54 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

ठळक मुद्देभाडेकरू ठेवले : महापालिकेची कारवाई

लोकमत प्रभावनाशिक : वडाळागाव घरकुल योजनेतील निवासस्थानाचा गैरवापर केला जात असल्याबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे वतीने घरकुल योजनेतील घरांची तपासणी केली असता चार घरकुले मालकांनी भाडेकरूंंना दिल्याचे आढळून आल्याने ही चारही घरे सील करण्याची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यासाठी मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केल्या होत्या. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची तपासणी करून महापालिकेने लाभार्थी निवडले होते व त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरे वाटप केली. मात्र यापैकी काही जणांना घरकुल योजनेची गरज नसतानाही घरे घेतली आहेत. तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. ज्यांना गरज नाही अशा मिळकतधारकांनी घरकुल योजनेतील घरे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला असून, जेव्हा मनपाच्या वतीने घरात लाभार्थी राहतो की नाही तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येतात त्यावेळी त्यांना आधीच माहिती होत असल्याने त्यावेळेस स्वत: लाभार्थी घरी हजर राहतो. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात. अलीकडेच यासंदर्भातील लोकमत वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अचानक वडाळागावातील घरकुल योजनेत जाऊन सदर घरकुलांमध्ये मालक राहतो की भाडेकरू याची तपासणी केली असता चार घरांमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत. अशा घरांचा पंचनामा करून सील करण्यात आले आहे. सदर मोहीम कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे ५० टक्के घरे संबंधित लाभार्थ्यांनी भाडेतत्त्वावर दिली असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्याठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका