शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वडाळागावातील चार घरकुले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:54 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

ठळक मुद्देभाडेकरू ठेवले : महापालिकेची कारवाई

लोकमत प्रभावनाशिक : वडाळागाव घरकुल योजनेतील निवासस्थानाचा गैरवापर केला जात असल्याबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे वतीने घरकुल योजनेतील घरांची तपासणी केली असता चार घरकुले मालकांनी भाडेकरूंंना दिल्याचे आढळून आल्याने ही चारही घरे सील करण्याची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यासाठी मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केल्या होत्या. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची तपासणी करून महापालिकेने लाभार्थी निवडले होते व त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरे वाटप केली. मात्र यापैकी काही जणांना घरकुल योजनेची गरज नसतानाही घरे घेतली आहेत. तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. ज्यांना गरज नाही अशा मिळकतधारकांनी घरकुल योजनेतील घरे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला असून, जेव्हा मनपाच्या वतीने घरात लाभार्थी राहतो की नाही तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येतात त्यावेळी त्यांना आधीच माहिती होत असल्याने त्यावेळेस स्वत: लाभार्थी घरी हजर राहतो. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात. अलीकडेच यासंदर्भातील लोकमत वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अचानक वडाळागावातील घरकुल योजनेत जाऊन सदर घरकुलांमध्ये मालक राहतो की भाडेकरू याची तपासणी केली असता चार घरांमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत. अशा घरांचा पंचनामा करून सील करण्यात आले आहे. सदर मोहीम कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे ५० टक्के घरे संबंधित लाभार्थ्यांनी भाडेतत्त्वावर दिली असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्याठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका