शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:01 IST

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार असून, लगोलग रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळेही बँका बंद राहणार असल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीत बँकांना मिळणार चार दिवस सुट्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

नाशिक : दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिन्यातील दुसरा शनिवार (दि.१०) असल्याने बँका बंद राहणार असून, लगोलग रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळेही बँका बंद राहणार असल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.दिवाळीच्या कालावधीत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औद्योगिक वसाहतींसह विविध क्षेत्रातील कामगार वर्गाचे वेतन थेट बँके च्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लगोलग दिवाळी सुरू होत असून, या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राहकासोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांमध्ये बँकांचे व्यवहार करण्यासाठी सोमवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते. जवळपास सर्वच बँकांनी आॅनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली असून, शहरातील ठिकठिकाणचे एटीएमचा ग्राहकांना आधार मिळणार आहे. परंतु अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अ‍ॅप आणि आॅनलाइन व्यवहार करीत नाही. अनेक जण रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. अशा ग्राहकांना मात्र रोख रकमेची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होण्याची शक्यता अर्थशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  

रोकड मिळणे कठीणदिवाळीच्या काळात असलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बाजारात रोकड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण घरातील देवी-देवतांसह रोख रकमेचीही पूजा करतात. त्यासाठी अगोदरच बँकेतून रोकड काढली जाते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून बँकेतून एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून रोख रक्कम काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांसोबतच एटीएममध्येही रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकbankबँकconsumerग्राहक