शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:35 IST

शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

नाशिक : शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटीदेखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातंवडे असा परिवार आहे.सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.  मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. संसरी गावात पहिलवान म्हणून त्यांनी ओळख होती. त्यांचे चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना राजकारणाचे शिवसेनेचे बाळकडू मिळाले. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. सुरूवातीला देवळाली कॅम्पचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा धडका त्यांनी लावला. त्यांचे संघटन कौशल्य बघून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्याकाळात संघटनेवर त्यांची पकड मजबुत झाली आणि तब्बल १२ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजवली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.  शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे चौथे महाअधिवेशन १९९४ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. दार उघड बये दार उघड असे साकडे त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घातले आणि त्यानंतरच १९९४-९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. त्यांच्या यशस्वी संयोजनामुळेच त्यांना १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली आणि नाशिक मतदार संघात (कै.) डॉ. वसंत पवार यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून गोडसे निवडून आले होते. संसरीसारख्या छोट्या गावातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता. खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या काळात शिवसेनेने सहकार क्षेत्रासह अनेक ठिकाणी सत्ता आणली. त्यामुळे त्यांची कारकिर्दीत शिवसेनेचे यशाचे शिखर गाठले होते.संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पुस्तकही लिहिले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर कामदेखील केले होते. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. मॉसाहेब मीनताई ठाकरे यांनी तर त्यांना मानसपुत्र मानले होते.

टॅग्स :Deathमृत्यू