शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:35 IST

शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

नाशिक : शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटीदेखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातंवडे असा परिवार आहे.सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.  मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. संसरी गावात पहिलवान म्हणून त्यांनी ओळख होती. त्यांचे चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना राजकारणाचे शिवसेनेचे बाळकडू मिळाले. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. सुरूवातीला देवळाली कॅम्पचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा धडका त्यांनी लावला. त्यांचे संघटन कौशल्य बघून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्याकाळात संघटनेवर त्यांची पकड मजबुत झाली आणि तब्बल १२ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजवली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.  शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे चौथे महाअधिवेशन १९९४ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. दार उघड बये दार उघड असे साकडे त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घातले आणि त्यानंतरच १९९४-९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. त्यांच्या यशस्वी संयोजनामुळेच त्यांना १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली आणि नाशिक मतदार संघात (कै.) डॉ. वसंत पवार यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून गोडसे निवडून आले होते. संसरीसारख्या छोट्या गावातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता. खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या काळात शिवसेनेने सहकार क्षेत्रासह अनेक ठिकाणी सत्ता आणली. त्यामुळे त्यांची कारकिर्दीत शिवसेनेचे यशाचे शिखर गाठले होते.संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पुस्तकही लिहिले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर कामदेखील केले होते. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. मॉसाहेब मीनताई ठाकरे यांनी तर त्यांना मानसपुत्र मानले होते.

टॅग्स :Deathमृत्यू