शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:35 IST

शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

नाशिक : शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटीदेखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातंवडे असा परिवार आहे.सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.  मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. संसरी गावात पहिलवान म्हणून त्यांनी ओळख होती. त्यांचे चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना राजकारणाचे शिवसेनेचे बाळकडू मिळाले. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. सुरूवातीला देवळाली कॅम्पचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा धडका त्यांनी लावला. त्यांचे संघटन कौशल्य बघून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्याकाळात संघटनेवर त्यांची पकड मजबुत झाली आणि तब्बल १२ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजवली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.  शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे चौथे महाअधिवेशन १९९४ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. दार उघड बये दार उघड असे साकडे त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घातले आणि त्यानंतरच १९९४-९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. त्यांच्या यशस्वी संयोजनामुळेच त्यांना १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली आणि नाशिक मतदार संघात (कै.) डॉ. वसंत पवार यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून गोडसे निवडून आले होते. संसरीसारख्या छोट्या गावातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता. खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या काळात शिवसेनेने सहकार क्षेत्रासह अनेक ठिकाणी सत्ता आणली. त्यामुळे त्यांची कारकिर्दीत शिवसेनेचे यशाचे शिखर गाठले होते.संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पुस्तकही लिहिले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर कामदेखील केले होते. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. मॉसाहेब मीनताई ठाकरे यांनी तर त्यांना मानसपुत्र मानले होते.

टॅग्स :Deathमृत्यू