शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व बैठक घेऊन आयुक्तांची पालकमंत्र्यांवर कुरघोडी

By admin | Updated: September 4, 2015 00:04 IST

लोकप्रतिनिधींच्या क्रोधावर फुंकर : विरोधातील धार कमी करण्याचा प्रयत्न

नाशिक : पास असूनही लोकप्रतिनिधींना सहन करावा लागलेला जाच, शहरवासीयांना गल्ली-बोळात डांबून ठेवल्याने निर्माण झालेला रोष व येऊ घातलेल्या आगामी पर्वणीला त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून व्यक्त होणारा संताप शमविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बुधवारी सकाळीच लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली. विशेष म्हणजे मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याच विषयावर बैठक बोलविलेली असताना लोकप्रतिनिधींनीही आयुक्तांना अधिक महत्त्व देत त्यांच्या दरबारी धूळ झाडली.पहिल्या पर्वणीच्या काळात शहरवासीयांना तीन दिवस पोलीस बॅरिकेडिंगमुळे पिंजऱ्यात बंदिस्त राहावे लागले. उद्योग, व्यवसायावर विपरित परिणाम झाला तसेच हातावर पोट भरणाऱ्यांना उपासमार सहन करावी लागली. शहर पूर्वपदावर आल्यानंतर या संदर्भातील तक्रारी वाढून पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याने साहजिकच लोकप्रतिनिधींनाही त्याची दखल घ्यावी लागली. गत पर्वणीचा अनुभव व होऊ घातलेल्या पर्वणीच्या काळात शहरवासीयांना सुसह्य वातावरण निर्मितीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदनेही देण्यात आली. राजकीय पक्षांनी तर अधिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्तकरत पोलिसिंगविरूद्ध आंदोलनाची भाषाही केली. त्यामुळे प्रशासनाला होऊ घातलेल्या पर्वणीचे फेर नियोजन करण्याचा निर्णय घ्यावा लागला व खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच सर्व लोकप्रतिनिधी, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत पोलिसी जाचाचा उहापोह होणे क्रमप्राप्त असल्याचे पाहून खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अन्य खात्यांचे शासकीय अधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रसारमाध्यमांसमोर पोलीस यंत्रणेची इभ्रत लोकप्रतिनिधींनी काढू नये म्हणून सकाळी १० वाजताच पोलीस आयुक्तालयात बैठक बोलविण्यात आली व लोकप्रतिनिधींच्या साऱ्या सूचनांचे पालन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना गप्पगार करण्यात आले. परिणामी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मौन पाळत प्रशासनाने तोंडी सुचविलेल्या बदलांवर माना हलविल्या व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीचे गांभीर्य नष्ट केले. राज्य सरकारातील मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री ज्या विषयावर बैठक बोलवितात, त्याच विषयाला अनुसरून आयुक्तांनी बैठक बोलवून राजशिष्टाचाराचा नुसता भंगच केला नाही, तर पालकमंत्र्यांचे महत्त्वही कमी करण्याचे पातक केले असून, त्यांच्या या कृत्यात लोकप्रतिनिधीही तितकेच सहभागी झाले आहेत.