शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

पूर्व बैठक घेऊन आयुक्तांची पालकमंत्र्यांवर कुरघोडी

By admin | Updated: September 4, 2015 00:04 IST

लोकप्रतिनिधींच्या क्रोधावर फुंकर : विरोधातील धार कमी करण्याचा प्रयत्न

नाशिक : पास असूनही लोकप्रतिनिधींना सहन करावा लागलेला जाच, शहरवासीयांना गल्ली-बोळात डांबून ठेवल्याने निर्माण झालेला रोष व येऊ घातलेल्या आगामी पर्वणीला त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून व्यक्त होणारा संताप शमविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बुधवारी सकाळीच लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली. विशेष म्हणजे मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याच विषयावर बैठक बोलविलेली असताना लोकप्रतिनिधींनीही आयुक्तांना अधिक महत्त्व देत त्यांच्या दरबारी धूळ झाडली.पहिल्या पर्वणीच्या काळात शहरवासीयांना तीन दिवस पोलीस बॅरिकेडिंगमुळे पिंजऱ्यात बंदिस्त राहावे लागले. उद्योग, व्यवसायावर विपरित परिणाम झाला तसेच हातावर पोट भरणाऱ्यांना उपासमार सहन करावी लागली. शहर पूर्वपदावर आल्यानंतर या संदर्भातील तक्रारी वाढून पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याने साहजिकच लोकप्रतिनिधींनाही त्याची दखल घ्यावी लागली. गत पर्वणीचा अनुभव व होऊ घातलेल्या पर्वणीच्या काळात शहरवासीयांना सुसह्य वातावरण निर्मितीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदनेही देण्यात आली. राजकीय पक्षांनी तर अधिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्तकरत पोलिसिंगविरूद्ध आंदोलनाची भाषाही केली. त्यामुळे प्रशासनाला होऊ घातलेल्या पर्वणीचे फेर नियोजन करण्याचा निर्णय घ्यावा लागला व खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच सर्व लोकप्रतिनिधी, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत पोलिसी जाचाचा उहापोह होणे क्रमप्राप्त असल्याचे पाहून खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अन्य खात्यांचे शासकीय अधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रसारमाध्यमांसमोर पोलीस यंत्रणेची इभ्रत लोकप्रतिनिधींनी काढू नये म्हणून सकाळी १० वाजताच पोलीस आयुक्तालयात बैठक बोलविण्यात आली व लोकप्रतिनिधींच्या साऱ्या सूचनांचे पालन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना गप्पगार करण्यात आले. परिणामी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मौन पाळत प्रशासनाने तोंडी सुचविलेल्या बदलांवर माना हलविल्या व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीचे गांभीर्य नष्ट केले. राज्य सरकारातील मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री ज्या विषयावर बैठक बोलवितात, त्याच विषयाला अनुसरून आयुक्तांनी बैठक बोलवून राजशिष्टाचाराचा नुसता भंगच केला नाही, तर पालकमंत्र्यांचे महत्त्वही कमी करण्याचे पातक केले असून, त्यांच्या या कृत्यात लोकप्रतिनिधीही तितकेच सहभागी झाले आहेत.