शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

यावल प्रकल्पबाधितांचा वन विभागाला घेराव

By admin | Updated: June 9, 2015 02:03 IST

लोकसंघर्ष मोर्चाचे आंदोलन सुरू

  नाशिक : यावल (जि. जळगाव) अभयारण्यातील सहा गावांतील सुमारे ७०० आदिवासी बांधवांचे वनहक्क जमिनींचे दावे असताना, प्रत्यक्षात फक्त १९ दावे मंजूर झाले असून, उर्वरित आदिवासी बांधवांवर अन्याय झाल्याचे कारण देत हे प्रस्ताव विलंबित का? तसेच या प्रकल्पातील बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी (दि. ८) नाशिक येथील वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाबाहेर लोेकसंघर्ष मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. ९ वाजेच्या सुमारास वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आंदोलनकर्त्याशी चर्चा करण्यासाठी आले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. सकाळी ११ वाजेपासून लोकसंघर्ष मोर्चा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी वनसंरक्षक कार्यालयास घेराव घातला. चर्चेसाठी वनसंरक्षक उपलब्ध नसल्याने रात्री उशिरापर्यंत ठिय्या कायम होता. वनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ अस्तित्वात आला. या कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी होत नाही म्हणून सुधारणा नियम २०१२ ही अस्तित्वात आले. या कायद्यांतर्गत वनांमध्ये राहणाऱ्या व वनांवर अवलंबून असलेल्या आदिवासींचे व्यक्तिगत व सामुदायिक दावे पात्र करण्याचा व निश्चित करण्याचा कायदा अमलात आला. यावल अभयारण्यातील सहा गावांतील सुमारे ७०० आदिवासी वनहक्कांचे दावे मंजुरीसाठी असताना, अवघे १९ दावेच मंजूर करण्यात आल्याने आदिवासी बांधवांवर अन्याय असल्याचे कारण देत लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने वनसंरक्षक विभागाला घेराव घालण्यात आला. यावेळी आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, पन्नालाल मावळे, चंद्रसिंग पावरा, पंडू बारेला, दिनू बारेला, लालसिंग बारेला, अश्विनी ठाकरे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)