शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST

वनखात्याने भुईमूग शेतीत लावली रोपे

नाशिक : राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीत दुसरा क्रमांक मिळविल्याचा डांगोरा पिटणाऱ्या नाशिकच्या वनखात्याने आदिवासींच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीतील भुईमुगाच्या पिकातच रोपे लावून अकरा आदिवासी कुटुंबांना विस्थापित केल्याची बाब नांदगाव तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून जमीन कसत असलेल्या या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वनखात्याने रोपे लावून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धुडकावून लावले आहेत.नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली या गावी सदरचा प्रकार घडला आहे. गट नंबर ४९८ मधील सुमारे वीस हेक्टर जागेचा ताबा १९८६ पासून अकरा कुटुंबांच्या ताब्यात असून, सध्या या जागेवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केलेली आहे. वन हक्क कायद्यान्वये या जागेचा ताबा कायमस्वरूपी कसत असलेल्या आदिवासी-बिगरआदिवासी शेतकऱ्यांकडे द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावाही दाखल करण्यात आलेला आहे. असे असताना १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली जात असताना वनखात्याने साक्री तालुक्यातील मजूर व जेसीबी यंत्र घेऊन या जागेचा ताबा घेतला व त्याठिकाणी भुईमुगाच्या शेतातच खड्डे खणून रोपांची लागवड केली. जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न मोडून काढण्यात आला व त्यांना विस्थापित केले. या संदर्भात २२ जानेवारी रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षकांना पत्र पाठवून शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या जमिनीवर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आदेश दिले आहेत. तथापि, वृक्षलागवडीत विक्रम करण्याच्या नादात वनखात्याने दांडगाई करीत भुईमुगात रोपांची लागवड केली व शेतकऱ्यांना विस्थापित केले आहे. या संदर्भात मंगळवारी कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा न दिल्यास १३ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोेषणास बसण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)