शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST

वनखात्याने भुईमूग शेतीत लावली रोपे

नाशिक : राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीत दुसरा क्रमांक मिळविल्याचा डांगोरा पिटणाऱ्या नाशिकच्या वनखात्याने आदिवासींच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीतील भुईमुगाच्या पिकातच रोपे लावून अकरा आदिवासी कुटुंबांना विस्थापित केल्याची बाब नांदगाव तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून जमीन कसत असलेल्या या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वनखात्याने रोपे लावून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धुडकावून लावले आहेत.नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली या गावी सदरचा प्रकार घडला आहे. गट नंबर ४९८ मधील सुमारे वीस हेक्टर जागेचा ताबा १९८६ पासून अकरा कुटुंबांच्या ताब्यात असून, सध्या या जागेवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केलेली आहे. वन हक्क कायद्यान्वये या जागेचा ताबा कायमस्वरूपी कसत असलेल्या आदिवासी-बिगरआदिवासी शेतकऱ्यांकडे द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावाही दाखल करण्यात आलेला आहे. असे असताना १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली जात असताना वनखात्याने साक्री तालुक्यातील मजूर व जेसीबी यंत्र घेऊन या जागेचा ताबा घेतला व त्याठिकाणी भुईमुगाच्या शेतातच खड्डे खणून रोपांची लागवड केली. जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न मोडून काढण्यात आला व त्यांना विस्थापित केले. या संदर्भात २२ जानेवारी रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षकांना पत्र पाठवून शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या जमिनीवर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आदेश दिले आहेत. तथापि, वृक्षलागवडीत विक्रम करण्याच्या नादात वनखात्याने दांडगाई करीत भुईमुगात रोपांची लागवड केली व शेतकऱ्यांना विस्थापित केले आहे. या संदर्भात मंगळवारी कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा न दिल्यास १३ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोेषणास बसण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)