शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST

वनखात्याने भुईमूग शेतीत लावली रोपे

नाशिक : राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीत दुसरा क्रमांक मिळविल्याचा डांगोरा पिटणाऱ्या नाशिकच्या वनखात्याने आदिवासींच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीतील भुईमुगाच्या पिकातच रोपे लावून अकरा आदिवासी कुटुंबांना विस्थापित केल्याची बाब नांदगाव तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून जमीन कसत असलेल्या या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वनखात्याने रोपे लावून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धुडकावून लावले आहेत.नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली या गावी सदरचा प्रकार घडला आहे. गट नंबर ४९८ मधील सुमारे वीस हेक्टर जागेचा ताबा १९८६ पासून अकरा कुटुंबांच्या ताब्यात असून, सध्या या जागेवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केलेली आहे. वन हक्क कायद्यान्वये या जागेचा ताबा कायमस्वरूपी कसत असलेल्या आदिवासी-बिगरआदिवासी शेतकऱ्यांकडे द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावाही दाखल करण्यात आलेला आहे. असे असताना १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली जात असताना वनखात्याने साक्री तालुक्यातील मजूर व जेसीबी यंत्र घेऊन या जागेचा ताबा घेतला व त्याठिकाणी भुईमुगाच्या शेतातच खड्डे खणून रोपांची लागवड केली. जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न मोडून काढण्यात आला व त्यांना विस्थापित केले. या संदर्भात २२ जानेवारी रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षकांना पत्र पाठवून शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या जमिनीवर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आदेश दिले आहेत. तथापि, वृक्षलागवडीत विक्रम करण्याच्या नादात वनखात्याने दांडगाई करीत भुईमुगात रोपांची लागवड केली व शेतकऱ्यांना विस्थापित केले आहे. या संदर्भात मंगळवारी कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा न दिल्यास १३ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोेषणास बसण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)