शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा कोंडीची जबाबदारी आता कोणते मंत्री घेणार?

By मिलिंद कुलकर्णी | Updated: September 24, 2023 17:02 IST

सलग दुसऱ्यांदा कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे.

मिलिंद कुलकर्णी (कार्यकारी संपादक, लोकमत, नाशिक)

सलग दुसऱ्यांदा कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. चार दिवसांपासून कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे. २१ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यापाऱ्यांची बाजू समजून घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पुन्हा महिन्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी बंद हत्यार उपसले. याचा अर्थ महिनाभरात केंद्रीय व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या विषयात तोडगा काढलेला नाही. निर्यात शुल्कात वाढ आणि ‘नाफेड’कडून खरेदी हे व्यापाऱ्यांच्या आक्षेपाचे प्रमुख मुद्दे आहेत. त्याविषयी ठोस भूमिका घ्यायला हवी. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी कारवाईचे आदेश दिले असले, तरी बाजार समित्यांकडून संथगतीने कारवाई सुरू आहे. कारण कारवाई करायला सोपी आहे; पण पर्यायी यंत्रणा अल्पकाळात उभारणे शक्य नाही. 

ही उदासीनता जिवावर बेतेल!त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिनेबारीजवळील छोट्या धबधब्याजवळ लावलेला फलक गायब झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या या धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होतात. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणे, रस्त्यातील दगड शेवाळयुक्त होणे यामुळे अपघात घडू शकतात. याची सूचना देण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा फलक लावला असेल, असा तर्क आहे; पण तो गायब झाल्याचे या विभागाच्या गावीही नाही, असे दिसते. ही जागरुकता कधी येईल?

शिवसेनादेखील काँग्रेसच्या मार्गावरवाण नसला तरी गुण लागतो, ही म्हण शिवसेनेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्रानुसार चालणाऱ्या शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून काम करताना येणारी बंधने, मर्यादा यांची जाणीव होऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीत फरक आहे. महाविकास आघाडीत सेनेचा सहभागी आणि ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणे हा बदल शिवसेनेच्या बदलत्या धोरणाचा भाग आहे; पण ‘ठंडा करके खाओ’ ही काँग्रेस संस्कृती सेनेत कधीच नव्हती. ‘एक घाव, दोन तुकडे’ अशी कार्यपद्धती होती. खुद्द बाळासाहेब असतानाही पुतण्या राज ठाकरे यांच्या बंडाच्या वेळी त्याचा प्रत्यय आला; पण बबनराव घोलप यांच्या नाराजीनाट्याविषयी शिवसेना नेतृत्व पेचात सापडलेले दिसतेय. १५ दिवस उलटून निर्णय होत नाही. शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी घेऊन घोलप पिता-पुत्र दबावाच्या खेळी करीत आहे. आधीच एका मुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे यांच्या विरुध्द शरद पवार गट प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे, ही पार्श्वभूमी योगेश घोलप यांच्या भेटी पाठीमागे आहे. 

ठाकरे बंधूंच्या दौऱ्याने काय साधले?शिवसेनेचे उपनेते आदित्य ठाकरे व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. आदित्य ठाकरे हे दर महिन्याला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. कधी जनसंवाद यात्रेचे निमित्त असते, कधी युवकांशी संवादाचे कारण असते. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. निवडणुका जवळ आल्या की, नेत्यांचे दौरे वाढतात, हे खरे आहे. ठाकरे हे स्वत: मंत्री, तर वडील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे दु:ख कमी करण्यासाठी काय प्रयत्न झाले, याविषयी ते बोलत नाहीत. केवळ सरकारला जबाबदार धरून विरोधकाची भूमिका मांडत आहेत. अमित ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बैठक घेतली, पण संघटनेला अद्याप शहराध्यक्ष नियुक्त करता आलेला नाही, हे कसे विसरता येईल. 

भेटीगाठींचे रंगले राजकारण निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे प्रत्येकजण स्वत:ची सोय बघत आहे. राज्यातील राजकारणाची समीकरणे इतकी बदलली आहेत, की प्रत्येक मतदारसंघात त्याचे पडसाद उमटत आहे. स्थानिक नेत्यांना समीकरणांची नव्याने फेरमांडणी करावी लागत आहे. २०१४ पूर्वी कसे होते, युती आणि आघाडी असा सरळसरळ सामना होता. दोन अधिक दोन म्हणजे चार असे साधेसोपे गणित होते. आज चित्र एकदम बदलले आहे. योगेश घोलप आदल्या दिवशी नाशकात आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते, दुसऱ्या दिवशी मुंबईत ते शरद पवार यांना भेटले. त्यांचे वडील बबनराव घोलप ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेटले. निफाडचे अनिल कदम देखील शरद पवार यांना भेटले. आमदार दिलीप बनकर अजित पवार गटात सहभागी झाल्याने कदमांची भेट महत्वाची आहे.

उद्योग क्षेत्रासाठी सुखद वार्तानाशिकच्या औद्योगिक विकासासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. राजकीय पक्ष, औद्योगिक संघटना केवळ आश्वासने देत आहेत, वास्तवात काहीच घडत नाही. एकेकाळची यंत्रभूमी आता ओसाड होत आहे. कुशल मनुष्यबळ स्थलांतरित होत आहे. त्यात दोन सुखद वार्ता आल्या. निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मल्टीमॉडेल हब उभारण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या खात्यात जेएनपीएने १०८ कोटी रुपये जमा केले. या निधीतून निफाड कारखान्याची १०८ एकर जमीन तर खासगी ८.६ एकर जमीन खरेदी केली जाईल. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी या निधीतून थकीत रकमा देण्याची मागणी केली असली तरी ते शक्य दिसत नाही. २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा नऊ वर्षांनंतर पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे. दुसरे म्हणजे सिन्नर तालुक्यात जिंदालच्या उद्योगात अमेरिकन कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा