शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

लोककला ही इंटरनेटहून प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:12 IST

जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.

नाशिक : जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅबच्या इमारतीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. विजया पाटील, वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नॅबचे सचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले, आपली संस्कृती ही ‘आयटम साँग’ची नसून लोकगीतांची आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणात आपल्या मातीतील लोककला, लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे मत चंदनशिवे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी ‘नभातुनी आली अप्सरा’ तसेच ‘माझी मैना गावावर राहिली’सारखी चित्रपट व लोकगीते सदर करून युवा महोत्सवात रंग भरला. दरम्यान, अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनेश भोंडे यांनी आगामी काळात विद्यापीठात ‘नाट्य व लोककला’ विद्याशाखा सुरू करण्याचे सुतोवाच केले. नाशिक विभागीय संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.आज पारितोषिक वितरणकेंद्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रावरील साधारण दोनशेहून अधिक विद्याथ़्र्यांनी युवक महोत्सवात एकांकिका, नाटिका, मुकाभिनय, नकला, शास्त्रीय समूह-सुगम व पाश्चात्य गायन, हार्मोनियम, तबला, पखवाज वादन आदी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाविष्कांराचे सादरीकरण केले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी (दि.२५) होणार असून, या बक्षीस वितरण सोहळ्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य-२०१८’ आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक