शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आशापूर येथे विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:53 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आशापुर (टेंभुरवाडी ) येथे विघुत वाहक तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने शेतातील चारा जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि.२४) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

आशापूर येथील गट नंबर १५६९ हे प्रसाद बन्सी पाटोळे यांच्या मालकीचे असून त्यांनी आपल्या या गटात जनावरांना बांधण्यासाठी झाप व गोठा बांधलेला आहे. शेजारीच त्यांनी ५०० गवताच्या पेंड्या, एक ट्रॅक्टर तणस, तर ५०० कडब्याच पेंड्या विकत आणून साठवून ठेवला होता. सदरच्या गटनंबर मधून वीज वितरण कंपनीची तारा गेलेल्या आहेत. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या तारेवर कावळे बसल्याने तारेमध्ये घर्षण होऊन गवताच्या सुडीवर त्याची ठिणगी पडल्याने गवतास आग लागली. गवत वाळलेले असल्याने आग वाढतच गेली. गावापासून काही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आग पाहताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शेताकडे धाव घेतली. आग वाढतच गेल्याने पाटोळे यांचे संपूर्ण गवत जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावपळ करत गवताशेजारीच बांधलेले दोन बैल, गाय व वासरु सोडून अन्य ठिकाणी हलविले त्यामुळे जीवित हानी झाली नाही. पाटोळे यांचे अंदाजे तीस हजाराचे नुकसान झाले आहे. तलाठी वाय. आर. गावित यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

टॅग्स :fireआग