शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीचे केंद्रबिंदू : नामपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

सटाणा : प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण, पांडव यांच्या वास्तव्यामुळे बागलाणला देवभूमीदेखील म्हणतात. शिवशाहीपासून ब्रिटिश काळात झालेल्या अपूर्व लढ्यामुळे बागलाणच्या भूमीला ...

सटाणा : प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण, पांडव यांच्या वास्तव्यामुळे बागलाणला देवभूमीदेखील म्हणतात. शिवशाहीपासून ब्रिटिश काळात झालेल्या अपूर्व लढ्यामुळे बागलाणच्या भूमीला क्रांतिकारी भूमी म्हणूनदेखील ओळखतात. या भूमीने अनेक क्रांतिकारक पुत्रांनादेखील जन्म दिला. ब्रिटिश राजवट नष्ट करण्यासाठी बागलाणच्या पुत्रांचे मोठे योगदान राहिले आहे. सारा वाढविरोधी चळवळ, भिलवाड व पठावे येथील जंगल सत्याग्रह, कायदेभंगाची चळवळ राष्ट्रप्रेमाबद्दल प्रखर भावना असलेले नामपूरचे भूमिपुत्र क्रांतिवीर नरहरशेठ अलई यांनी प्रथम उभी केली. त्यामुळे ब्रिटिश काळात नामपूर हे चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जात असल्याचे इतिहासाची पाने चाळताना दिसून येते.

बागलाणचे बाबा म्हणून ओळखले जाणाऱ्या नरहरशेठ गोपाळ अलई यांचा वीर सावरकर चौकातील वाडा आपल्याला चळवळींचा इतिहास सांगायला लागतो. पूर्वी हा वाडा खूप मोठा होता. वाड्यात एका भागाला रंगमहालही म्हटले जायचे. पूर्वी हा रंगमहाल अनेक चित्रांनी सजलेला होता. यातील चित्र अनेकांना भुरळ घालायची. म्हणूनच त्याला रंगमहाल म्हटले गेले. मात्र ही वास्तू आता शिल्लक नाही. नरहरशेठ यांचा नामपूरच्या अत्यंत सधन कुटुंबात जन्म झाला होता. व्यवसायाने सावकारीत असूनही गरजूंना मोकळ्या हाताने मदत करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकले नाही. शिवाय त्याचा कोणताही हिशेब ते ठेवत नसत, त्यामुळे त्यांना अव्यवहारी शेठ असेही म्हटले जायचे. बागलाणमधील चळवळींना तन, मन आणि धनाने प्रोत्साहन देणारे नरहरशेठ यांच्या वाड्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींची रेलचेल असे. राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेल्यावर स्वातंत्र्यसैनिकाला मदत करणाऱ्या वड‌िलांचे कार्य बाबांनीही सुरू ठेवले. असहकार चळवळ, विदेशी कापडाची होळी, बागलाणातील सारावाढविरोधी चळवळ, कायदेभंग अशा अनेक चळवळीत ते सक्रिय झाले. परदेशी कापडावर बहिष्कार घालून ते थांबले नाहीत. तर आपल्या वाड्यात खादीनिर्मितीचे केंद्र त्यांनी सुरू केले. शंभर चरख्यापासून निघालेल्या सुतापासून वस्त्रनिर्मितीसाठी त्यांनी वीस हातमाग वाड्यात सुरू केले होते. बाबांच्या वाड्यात चरख्याचे संगीत दुमदुमू लागायचे अशी आठवण आजही ज्येष्ठ मंडळी सांगतात. बाबांचा वाडा तर स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान होते. सारावाढविरोधी चळवळीची सुरुवातच त्यांनी नामपूरमधून केली. या चळवळीचे लोण हळूहळू अख्ख्या नाशिकमध्ये असे पसरले की, इंग्रजांमध्येही दहशत निर्माण झाली होती. लोकमान्य टिळकांनीही नरहरशेठ यांच्या वाड्यात बैठक घेऊन नामपूरमध्ये सभा घेतली होती, तर गो. ह. देशपांडे, द. शं. ऊर्फ दादासाहेब पोतनीस, डॉ. खाडिलकर, डॉ. गंगाधर भुतेकर, डॉ. मोहिनीराज काथे, दादासाहेब बीडकर, वा. ज. मराठे, गद्रे वकील, नारायण खुटाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. खरे, वामनराव यार्दी यासारखी मंडळी बाबांच्या वाड्यावर बैठकांना असत. तर सारावाढीच्या लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मार्गदर्शन लाभले होते. बाबांच्या वाड्यात अनेक गुप्त बैठका होत. स्वातंत्र्यसैनिकांना भूमिगत होण्यासाठी वाड्यात लपविले जाई. मिठाच्या सत्याग्रहातही नामपूरहून एक तुकडी रवाना झाली होती. त्यांना इंग्रजांनी अटक करून रत्नागिरी तुरुंगात ठेवले. २१ दिवसांनंतर त्यांची सुटका केली. त्यावेळी त्या सत्याग्रहींनी सोबत आणलेल्या मिठाचा लिलाव करून सहा हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी उभारला व

जंगल सत्याग्रहासाठी तो नरहरशेठ यांच्याकडे दिला. या प्रसंगावरून नामपूरच्या मंडळींनी प्रत्येक लढ्यात संघटित होऊन दिलेले योगदान किती मोठे आहे याचा अंदाज येतो. भिका खंडूशेठ कासार, पुंडलिक दत्त सावंत, गणपत खुटाडे यांच्यासह ग्रामस्थांनीही लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. नरहर अलई यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही झाली. स्वातंत्र्यलढ्याचा पारा नामपूरवर असा काही चढला होता की, २६ जानेवारी १९३० रोजी गावच्या चावडीवर नारायण गणपत खुटाडे यांनी तिरंगा फडकविला. यावरून नामपूरचे वातावरण तंग झाले. शेकडो इंग्रज पोलीस गावात दाखल झाले; मात्र तिरंगा काढण्याची हिंमत कोणाला झाली नाही. अखेर ९ फेब्रुवारी १९३० रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तिरंगा उतरविण्यात आला. नामपूरच्या अनेक मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी इतिहासकारांकडून ऐकायला मिळतात.