शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उड्डाणपुलामुळे नवीन वर्षात होणार वाहतूक सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:25 IST

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसध्या ही कामे ८० टक्के पूर्ण झाली

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याच मार्गावर असलेल्या ओझर व पिंपळगाव बसवंत येथील पुलाचेही काम पूर्णत्वाकडे आले असल्याने नवीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुकर होणार आहे .नाशिक शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विस्तारिकरणात गरवारे पॉंईट ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालय दरम्यान सहा भुयारी मार्ग व प्रकाश पेट्रोल पंपापासून पावणेसहा किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील व समांतर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असली तरी, के. के. वाघ ते हॉटेल जत्रापर्यंत जागोजागी वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे विस्तारिकरण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार करून त्यास केंद्र सरकारने मान्यताही दिली होती. कोट्यवधी रूपये खर्चाच्या या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली. या विस्तारित उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. सध्या या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के झाले असून, मुख्य उड्डाणपुलाला तो जोडण्यासाठी पुढच्या महिन्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मार्च अखेरीस ठेकेदारास काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी, कोरोना काळात सहा महिने काम बंद असल्याने आता मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.पाच वर्षे लागली कामालाया विस्तारित उड्डाणपुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सन २०१६ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर मात्र कामाचा खोळंबा झाला. उड्डाणपुलाचा नकाशा तयार करण्यापासून ते त्यासाठी निधीची तरतूद व प्रत्यक्ष निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरूवात होण्यातच दोन वर्षाचा कालावधी लोटला व सन २०१९ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. २०२१ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूरसन २०२० राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर करणारे वर्ष ठरले. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ओझर व पिंपळगाव बसवंत येथील ग्रामस्थांकडून महामार्गाच्या विस्तारिकरणासाठी असलेला विरोध काही प्रमाणात मावळला. त्यातूनच ओझरला ४ किलोमीटरचा उड्डाणपूल व पिंपळगाव बसवंत येथे ५०० मीटर व कांदा मार्केट येथे ४०० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली. सध्या ही कामे ८० टक्के पूर्ण झाली असून, नवीन वर्षात त्यावरून वाहतूक सुरू होईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा