शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

खेरवाडी  रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:59 IST

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआराखडा तयार; पर्यायी व्यवस्थेची मागणी

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू करावयाचे असल्याने रस्त्यालगत असलेली दुकाने, टपऱ्या हटविण्याचे आदेश रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. फाटक बंद होणार असल्याने या मार्गावरील बससेवा बंद होणार असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अडचण निर्माण होणार आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने काढली जाणार असल्याने व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली असून, रस्ता बंदमुळे येथील उद्योगधंदे कोलमडून पडणार आहेत. ओझर-शिर्डी महामार्गावर रहदारीत वाढ झाल्याने खेरवाडी येथे फाटक करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.त्याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाºयांनी नुकतीच खेरवाडी येथे जाऊन ग्रामसभा घेत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. खेरवाडी येथील रेल्वे फाटक क्र. ९४ फाटक वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महारेलचे अभियंता स्वानंद राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई व व्यावसायिक, शेतकरी यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांकडे अडचणी कथन केल्या. रेल्वे गेट बंद होणार असून, दुचाकी व छोट्या वाहनांकरिता जवळच्या भुयारी मार्गाचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावरून धावणाºया बस बंद होणार असून, शालेय विद्यार्थ्यांना मोठी अडचण होणार आहे. शेतकºयांना माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सद्यस्थितीत परीक्षेचा कालावधी सुरू झाल्याने चांदोरी, सायखेडा, सय्यदपिंप्री येथेशाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच याच परिसरातून भाजीपाला व शेतमाल नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो, त्यामुळे आता शेतकºयांना चितेगाव, चांदोरीमार्गे जावे लागणार आहे, तर खेरवाडी येथील शेतकºयांना ओझरला जाण्यासाठी सुकेणेमार्गे जावे लागणार आहे.उड्डाणपुलानंतर प्रवास सुखकरउड्डाणपुलाचे काम साधारणपणे ८ ते १२ महिने चालणार असून, येथील उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे. मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर व जलद होणार असल्याचे मतदेखील अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे