शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

खेरवाडी  रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:59 IST

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआराखडा तयार; पर्यायी व्यवस्थेची मागणी

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू करावयाचे असल्याने रस्त्यालगत असलेली दुकाने, टपऱ्या हटविण्याचे आदेश रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. फाटक बंद होणार असल्याने या मार्गावरील बससेवा बंद होणार असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अडचण निर्माण होणार आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने काढली जाणार असल्याने व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली असून, रस्ता बंदमुळे येथील उद्योगधंदे कोलमडून पडणार आहेत. ओझर-शिर्डी महामार्गावर रहदारीत वाढ झाल्याने खेरवाडी येथे फाटक करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.त्याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाºयांनी नुकतीच खेरवाडी येथे जाऊन ग्रामसभा घेत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. खेरवाडी येथील रेल्वे फाटक क्र. ९४ फाटक वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महारेलचे अभियंता स्वानंद राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई व व्यावसायिक, शेतकरी यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांकडे अडचणी कथन केल्या. रेल्वे गेट बंद होणार असून, दुचाकी व छोट्या वाहनांकरिता जवळच्या भुयारी मार्गाचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावरून धावणाºया बस बंद होणार असून, शालेय विद्यार्थ्यांना मोठी अडचण होणार आहे. शेतकºयांना माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सद्यस्थितीत परीक्षेचा कालावधी सुरू झाल्याने चांदोरी, सायखेडा, सय्यदपिंप्री येथेशाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच याच परिसरातून भाजीपाला व शेतमाल नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो, त्यामुळे आता शेतकºयांना चितेगाव, चांदोरीमार्गे जावे लागणार आहे, तर खेरवाडी येथील शेतकºयांना ओझरला जाण्यासाठी सुकेणेमार्गे जावे लागणार आहे.उड्डाणपुलानंतर प्रवास सुखकरउड्डाणपुलाचे काम साधारणपणे ८ ते १२ महिने चालणार असून, येथील उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे. मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर व जलद होणार असल्याचे मतदेखील अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे