शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडी  रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:59 IST

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआराखडा तयार; पर्यायी व्यवस्थेची मागणी

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू करावयाचे असल्याने रस्त्यालगत असलेली दुकाने, टपऱ्या हटविण्याचे आदेश रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. फाटक बंद होणार असल्याने या मार्गावरील बससेवा बंद होणार असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अडचण निर्माण होणार आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने काढली जाणार असल्याने व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली असून, रस्ता बंदमुळे येथील उद्योगधंदे कोलमडून पडणार आहेत. ओझर-शिर्डी महामार्गावर रहदारीत वाढ झाल्याने खेरवाडी येथे फाटक करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.त्याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाºयांनी नुकतीच खेरवाडी येथे जाऊन ग्रामसभा घेत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. खेरवाडी येथील रेल्वे फाटक क्र. ९४ फाटक वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महारेलचे अभियंता स्वानंद राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई व व्यावसायिक, शेतकरी यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांकडे अडचणी कथन केल्या. रेल्वे गेट बंद होणार असून, दुचाकी व छोट्या वाहनांकरिता जवळच्या भुयारी मार्गाचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावरून धावणाºया बस बंद होणार असून, शालेय विद्यार्थ्यांना मोठी अडचण होणार आहे. शेतकºयांना माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सद्यस्थितीत परीक्षेचा कालावधी सुरू झाल्याने चांदोरी, सायखेडा, सय्यदपिंप्री येथेशाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच याच परिसरातून भाजीपाला व शेतमाल नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो, त्यामुळे आता शेतकºयांना चितेगाव, चांदोरीमार्गे जावे लागणार आहे, तर खेरवाडी येथील शेतकºयांना ओझरला जाण्यासाठी सुकेणेमार्गे जावे लागणार आहे.उड्डाणपुलानंतर प्रवास सुखकरउड्डाणपुलाचे काम साधारणपणे ८ ते १२ महिने चालणार असून, येथील उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे. मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर व जलद होणार असल्याचे मतदेखील अनेकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे