शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या संभ्रम आदेशाने ग्रामसभांवर फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

ग्रामपंचायतींनी वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचा नियम असून, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने ठाण मांडल्यामुळे या ग्रामसभांवर गंडांतर आले होते. यंदा मात्र ...

ग्रामपंचायतींनी वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचा नियम असून, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने ठाण मांडल्यामुळे या ग्रामसभांवर गंडांतर आले होते. यंदा मात्र कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामसभा घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला असता, जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार, कोविड नियम व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याचा विचार करून, त्या-त्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा परिषदेने शुक्रवार (दि. १३) रोजी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामसभा घेण्याबाबत कळविले. त्यात प्रामुख्याने ज्या ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण नाहीत, तसेच पॉझिटिव्ह रेट कमी आहे, अशा ठिकाणी ग्रामसभा घेण्यात यावी, ग्रामसभा आयोजित करताना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामपंचायतींना प्रशासनाचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत ग्रामसभा घेणे अशक्य असल्याचे कारण पुढे करतानाच जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांचे जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले असल्याने ग्रामसभा कशी घ्यावी, असा पेच ग्रामसेवकांना पडला. शिवाय ग्रामसभेसाठी गर्दी झाल्यास कायद्याचा भंग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करून तशी विचारणाही ग्रामसेवक संघटनेने प्रशासनाकडे केली असता, ऐनवेळी ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात तेही अशक्य असल्याने ग्रामसेवकांनी थेट ग्रामसभांवरच फुली मारली आहे.

चौकट===

मंत्री-प्रशासनात बेबनाव

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांना स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले हाेते. त्याचवेळी प्रशासनाकडून मात्र ग्रामसेवकांना ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री मोठा की प्रशासन, असा प्रश्न ग्रामसेवकांना पडला व ग्रामसभांचा निर्णय गुंडाळावा लागला