शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

प्रशासनाच्या संभ्रम आदेशाने ग्रामसभांवर फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

ग्रामपंचायतींनी वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचा नियम असून, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने ठाण मांडल्यामुळे या ग्रामसभांवर गंडांतर आले होते. यंदा मात्र ...

ग्रामपंचायतींनी वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचा नियम असून, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने ठाण मांडल्यामुळे या ग्रामसभांवर गंडांतर आले होते. यंदा मात्र कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामसभा घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला असता, जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार, कोविड नियम व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याचा विचार करून, त्या-त्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा परिषदेने शुक्रवार (दि. १३) रोजी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामसभा घेण्याबाबत कळविले. त्यात प्रामुख्याने ज्या ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण नाहीत, तसेच पॉझिटिव्ह रेट कमी आहे, अशा ठिकाणी ग्रामसभा घेण्यात यावी, ग्रामसभा आयोजित करताना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामपंचायतींना प्रशासनाचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत ग्रामसभा घेणे अशक्य असल्याचे कारण पुढे करतानाच जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांचे जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले असल्याने ग्रामसभा कशी घ्यावी, असा पेच ग्रामसेवकांना पडला. शिवाय ग्रामसभेसाठी गर्दी झाल्यास कायद्याचा भंग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करून तशी विचारणाही ग्रामसेवक संघटनेने प्रशासनाकडे केली असता, ऐनवेळी ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात तेही अशक्य असल्याने ग्रामसेवकांनी थेट ग्रामसभांवरच फुली मारली आहे.

चौकट===

मंत्री-प्रशासनात बेबनाव

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांना स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले हाेते. त्याचवेळी प्रशासनाकडून मात्र ग्रामसेवकांना ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री मोठा की प्रशासन, असा प्रश्न ग्रामसेवकांना पडला व ग्रामसभांचा निर्णय गुंडाळावा लागला