शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उड्डाणपूल : असून अडचण, नसून खोळंबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:14 IST

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या दोन्ही कामांसाठी बराच कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक कोंडी म्हणजे उड्डाणपूल असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.तीन आठवड्यांपूर्वी कमोदनगरकडून सुंदरबन कॉलनीकडे उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव येणाºया वाहनाच्या धडकेत दोघे मायलेक ठार झाले होते. तेव्हापासून उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर निदर्शनास आलेल्या वाहतूक त्रुटींची अधिक चर्चा होऊन प्रलंबित कामांचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू झाला. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान उड्डाणपुलाच्या विस्तारीकरण करण्याच्या कामालाही राष्टयमहामार्ग प्राधिकरणाने सुरुवातकेली असून, सिडकोतील लेखानगर येथे यू-टर्नच्या कामालाही येत्या आठवड्यात सुरुवात केली जाणार असल्याने त्या दृष्टीने तयारीला सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलावर व पुलाखाली सुरू होणा-या या कामामुळे आत्तापासूनच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.विल्होळी भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावरनाशिक महापालिका हद्दीला लागून असलेल्या महामार्गावरील विल्होळी येथेही भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, मध्यंतरी पावसाळ्यामुळे दोन महिने मंदावलेला कामाचा वेग आता वाढला आहे. दहा वर्षांपासून या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती; परंतु राष्टय महामार्ग प्राधिकरणाने काम मंजुरीस विलंब केल्यामुळे काम सुरू होऊ शकले नव्हते. सहा महिन्यांपासून भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने याठिकाणीही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावर एकेरी वाहतूकउड्डाणपूल ओलांडताना दोघांचे बळी गेल्यामुळे उड्डाणपुलाखालून सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर जोडणाºया भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सिडकोकडील भागात सुंदरबन कॉलनीच्या तोंडाशी सुरू असलेल्या या कामासाठी जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा खणण्याचे काम यंत्राच्या साहाय्याने सुरू असून, त्याच बाजूने उड्डाणपुलाला या कामामुळे धोका पोहोचू नये यासाठी उड्डाणपुलावरून धुळ्याकडे जाणाºया वाहतुकीत बदल करून ती एकतर्फी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया वाहनांसाठी एकेरी मार्गाचा वापर करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असून, त्यातही जर अवजड वाहने असतील तर त्यांचा वेग पाहता उड्डाणपुलावर लांबच लांब रांगा लागत आहेत.लेखानगर यू-टर्नचे काम लवकरचसिडकोतील पेठेनगर-लेखानगर या दोन्ही भागांना जोडण्यासाठी उड्डाणपुलाखाली यू-टर्नचे काम हाती घेण्यासही राष्टय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, त्यामुळे इंदिरानगर बोगद्यात वाहनांची होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. सदरचे काम गेल्या वर्षीच मंजूर करण्यात आले असले तरी, लेखानगर येथे स्थानिक रहिवासी व काही राजकीय व्यक्तींच्या दबावापोटी काम सुरू केले जात नव्हते. आता मात्र सुंदरबन कॉलनी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने राष्टय महामार्ग प्राधिकरणाने लेखानगर येथे यू-टर्नचे काम सुरू करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक