शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

उड्डाणपूल : असून अडचण, नसून खोळंबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:14 IST

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या दोन्ही कामांसाठी बराच कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक कोंडी म्हणजे उड्डाणपूल असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.तीन आठवड्यांपूर्वी कमोदनगरकडून सुंदरबन कॉलनीकडे उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव येणाºया वाहनाच्या धडकेत दोघे मायलेक ठार झाले होते. तेव्हापासून उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर निदर्शनास आलेल्या वाहतूक त्रुटींची अधिक चर्चा होऊन प्रलंबित कामांचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू झाला. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान उड्डाणपुलाच्या विस्तारीकरण करण्याच्या कामालाही राष्टयमहामार्ग प्राधिकरणाने सुरुवातकेली असून, सिडकोतील लेखानगर येथे यू-टर्नच्या कामालाही येत्या आठवड्यात सुरुवात केली जाणार असल्याने त्या दृष्टीने तयारीला सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलावर व पुलाखाली सुरू होणा-या या कामामुळे आत्तापासूनच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.विल्होळी भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावरनाशिक महापालिका हद्दीला लागून असलेल्या महामार्गावरील विल्होळी येथेही भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, मध्यंतरी पावसाळ्यामुळे दोन महिने मंदावलेला कामाचा वेग आता वाढला आहे. दहा वर्षांपासून या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती; परंतु राष्टय महामार्ग प्राधिकरणाने काम मंजुरीस विलंब केल्यामुळे काम सुरू होऊ शकले नव्हते. सहा महिन्यांपासून भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने याठिकाणीही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावर एकेरी वाहतूकउड्डाणपूल ओलांडताना दोघांचे बळी गेल्यामुळे उड्डाणपुलाखालून सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर जोडणाºया भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सिडकोकडील भागात सुंदरबन कॉलनीच्या तोंडाशी सुरू असलेल्या या कामासाठी जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा खणण्याचे काम यंत्राच्या साहाय्याने सुरू असून, त्याच बाजूने उड्डाणपुलाला या कामामुळे धोका पोहोचू नये यासाठी उड्डाणपुलावरून धुळ्याकडे जाणाºया वाहतुकीत बदल करून ती एकतर्फी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया वाहनांसाठी एकेरी मार्गाचा वापर करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असून, त्यातही जर अवजड वाहने असतील तर त्यांचा वेग पाहता उड्डाणपुलावर लांबच लांब रांगा लागत आहेत.लेखानगर यू-टर्नचे काम लवकरचसिडकोतील पेठेनगर-लेखानगर या दोन्ही भागांना जोडण्यासाठी उड्डाणपुलाखाली यू-टर्नचे काम हाती घेण्यासही राष्टय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, त्यामुळे इंदिरानगर बोगद्यात वाहनांची होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. सदरचे काम गेल्या वर्षीच मंजूर करण्यात आले असले तरी, लेखानगर येथे स्थानिक रहिवासी व काही राजकीय व्यक्तींच्या दबावापोटी काम सुरू केले जात नव्हते. आता मात्र सुंदरबन कॉलनी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने राष्टय महामार्ग प्राधिकरणाने लेखानगर येथे यू-टर्नचे काम सुरू करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक