शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:32 IST

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीवरून राष्टÑवादी कॉँग्रेसने सत्ताधारी भाजपा सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे.  मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत गोंदे ते पिंपळगाव या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या सहा पदरीकरणाचे काम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक शहरातून जाणाºया या राष्टÑीय महामार्गाच्या उभारणीतून शहरांतर्गत वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून प्रकाश पेट्रोलपंप ते थेट पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सुमारे ६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. तर गरवारे चौफुली, पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर, इंदिरानगर याठिकाणी लहान पूल उभारण्यात येऊन राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक थेट मुंबईहून धुळ्याकडे तर धुळ्याकडून मुंबईकडे या उड्डाणपुलाच्या माध्यमातून काढण्यात आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये या पुलाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.खड्ड्यांमुळे अपघातात वाढसर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांची अवस्था तर अतिशय भयंकर आहे. वाहनचालकाने कितीही सुरक्षित वाहन हाकण्याचा प्रयत्न केला तरी, खड्ड्यात जाणे क्रमप्राप्त आहे. काही ठिकाणी तर पुलावरील सर्व डांबर वाहून गेले व सीमेंट तसेच पुलाच्या बांधणीतील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास त्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताला आमंत्रणही मिळाले आहे. लहान वाहनांचे खड्ड्यात आदळून टायर फुटण्याचे तसेच टायर बेंड होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत.पुलासाठी पिंपळगावला टोल नाकानाशिककरांच्या सोयीसाठी त्याचबरोबर मुंबईहून धुळ्याकडे व धुळ्याकडून मुंबईकडे विनासायास वाहने जाण्यासाठी शहरात उभारण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलासाठी पिंपळगाव बसवंत येथे टोलनाका ठेवण्यात आला आहे. या टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली केली जात असून, त्यातून या महामार्गाच्या उभारणीसाठी आलेला खर्च कंपनीकडून वसूल केला जात आहे. साधारणत: तीन वर्षे ज्या कंपनीकडून रस्त्याची उभारणी केली जाते त्यांच्याकडून रस्त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात असल्याने एल एन्ड टी या कंपनीची आता जबाबदारी संपुष्टात आली आहे. त्यामुळेच या महामार्गाची दुरवस्था झाली आहे.पावसामुळे दुरवस्थाइगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंपळगाव बसवंतपर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, खड्डे चुकविण्याच्या नादात लहान-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. मध्यंतरी या महामार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, परंतु आता खड्ड्यांची अवस्थाच अशी झाली की, वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकरची गरजच राहिलेली नाही. यंदा सर्वाधिक पाऊस झाल्यामुळेच रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची संख्याही अधिक असल्याकारणानेदेखील रस्ता वारंवार नादुरुस्त होण्याचे आणखी एक कारण आहे.