शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विश्वशांती धर्म सोहळ्याचे ओझरला ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:39 IST

जगद‌्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

ठळक मुद्देशांतिगिरी महाराज : भाविकांना सद‌्गुरु कार्याची तळमळ असावी

ओझर टाऊनशिप : जगद‌्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

खासदार डॉ.भारती पवार, भाजप नेते सुनील बागुल, भागवतबाबा बोरस्ते, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजासह जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, महिला जप, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तनआदी सात धर्मध्वजांचे ध्वजारोहण झाले.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहण सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. प्रारंभी आश्रम परिसरात पालखी मिरवणूक, सद‌्गुरुंच्या पादुकांचे पूजन, पालखीपूजन झाले.

भाविकांना मार्गदर्शन करताना शांतिगिरी महाराज म्हणाले, जनार्दनस्वामींसारखे महान सद‌्गुरु आपणा सर्वांना लाभले हे मोठे भाग्य असून, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांच्या कार्यात सहभागी होण्याची तळमळ हाच खरा भक्तिमार्ग आहे. भाविकांनी सद‌्गुरु कार्यात सेवा मागून घ्यावी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी हे वाक्य नेहमी स्मरणात ठेवा. गुरुसेवा निष्काम भावनेतून करा. आपल्या मनाला चांगल्या सवयी लावा. चित्त शुद्ध ठेवा असे त्यांनी सांगितले.

आश्रमाच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी भक्तिगीते सादर केली. ‘ओम जनार्दनाय नमः’ या महामंत्राचा जप यावेळी करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमShantigiri Maharajशांतिगिरी महाराज