शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

सुविधांसाठी संघर्ष पाचवीला पूजलेला

By admin | Updated: November 16, 2016 01:46 IST

कोकणीपुरा, बागवानपुरा : ‘दुबई वॉर्ड’ विकासापासून वंचित

अझहर शेख नाशिकजुन्या नाशकातील सध्याच्या ‘दुबई वॉर्ड’ची व्याप्ती वाढली आहे. मुस्लीमबहुल प्रभाग म्हणून ओळख असलेल्या दुबई वॉर्डला जोडल्या गेलेल्या नवीन भागामुळे प्रभागाची ओळख काही प्रमाणात बदलणार आहे. १९९२ पासून या प्रभागातील जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन पक्षांवर विश्वास दाखविला. प्रभागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळी झाला नाही. येथील नागरिकांना गावठाण भाग म्हणून सोयीसुविधांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आला आहे. सध्याचा प्रभाग २६ मधील परिसराचा गेल्या पाच वर्षांमध्ये कायापालट झाला; मात्र प्रभाग २८ चा परिसर जो नव्याने प्रभाग १४ मध्ये समाविष्ट झाला आहे त्या परिसरात अजूनही सोयीसुविधांची वानवा जाणवते. प्रभाग २८ मधून अपक्ष उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले आहे तर प्रभाग ३९ चा काही भाग सध्याच्या प्रभाग १४ मध्ये समाविष्ट असून. या भागात मनसेचे उमेदवार निवडून आले आहे तर प्रभाग २९ मधील काही भागही या प्रभागाला जोडला गेला असून, सध्या प्रभाग २९ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे.एकूणच प्रभाग क्रमांक १४ मध्ये सध्याचा संपूर्ण प्रभाग २६, प्रभाग २८, प्रभाग ३९, प्रभाग २९ च्या परिसराची भर पडली आहे. त्यामुळे ‘दुबई वॉर्ड’मध्ये यंदा मोठ्या प्रमाणात चुरस रंगणार आहे. प्रभागासाठी आरक्षण अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला व सर्वसाधारणच्या दोन जागा असल्यामुळे उड्या पडणार आहेत. प्रभागाचा राजकीय इतिहास बघितला असता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे; मात्र या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता यंदा या प्रभागातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. येथील आरक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. यामुळे भाऊगर्दी होणार आहे. राजकीय पार्श्वभूमी९९२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून शेख नसीर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. १९९७ साली महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसवर लोकांनी विश्वास दाखविला आणि सिराज जीन हे निवडून आले. त्यानंतर २००२ साली कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मैनुद्दीन कोकणी व रेश्मा मुल्ला हे दोन्ही उमेदवार निवडून आले, तर बिलाल खतीब हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. २००७ साली झालेल्या निवडणुकीत निजाम कोकणी निवडून आले. २०१२ साली पुन्हा राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे दोन उमेदवार जनतेने निवडून दिले. यामध्ये कॉँग्रेसच्या समिना मेमन, राष्ट्रवादीचे सुफीयान जीन यांच्याकडे प्रतिनिधित्व आले. संपूर्ण राज्यासह शहरातही मनसेची लाट असताना ‘दुबई वॉर्ड’ अपवाद ठरला व मनसेच्या उमेदवार लता कमोद यांचा दारुण पराभव झाला. प्रभाग २८मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय साबळे तर शबाना पठाण या अपक्ष म्हणून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्या. प्रभागाचा कौल बघता यावेळी निवडणुकीच्या दृष्टीने पठाण यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.