शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:48 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देभोजापूर खोरे। महिलांची पाण्यासाठी वणवण; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा तात्काळ सुरू करून पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी केली आहे. निसर्ग चक्री वादळाची तीव्रता लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीकडून सुमारे २० तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळामुळे परिसरासह भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा तसेच खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या योजनेवर आधारित असलेल्या पाच गावात दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. नांदुरशिंगोटे गाव परिसरात पिण्याच्या पाण्याचे इतर जलस्त्रोत नसल्याने नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिक धास्तावले असून कुठलेही पाणी पिण्यास धजावत नाही. त्यामुळे ही योजना तात्काळ सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाचही गावातील नागरिकांनी केली आहे. निसर्ग चक्र ीवादळाच्या तीव्रतेमुळे भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा व खांब पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे वीज वितरणचे शाखा अभियंता राहुल भगत यांनी सांगितले.कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु ळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल शेळके यांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाचा समावेश कणकोरी पाणी पुरवठा योजनेत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहेत. ग्रामस्थांनी पाण्याची बचत करु न महिलांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन सरपंच शेळके यांनी केले आहे. निसर्ग वादळाने भोजापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पोलचे नुकसान केले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरु ळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहनही सरपंच शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी