शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:48 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देभोजापूर खोरे। महिलांची पाण्यासाठी वणवण; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा तात्काळ सुरू करून पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी केली आहे. निसर्ग चक्री वादळाची तीव्रता लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीकडून सुमारे २० तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळामुळे परिसरासह भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा तसेच खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या योजनेवर आधारित असलेल्या पाच गावात दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. नांदुरशिंगोटे गाव परिसरात पिण्याच्या पाण्याचे इतर जलस्त्रोत नसल्याने नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिक धास्तावले असून कुठलेही पाणी पिण्यास धजावत नाही. त्यामुळे ही योजना तात्काळ सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाचही गावातील नागरिकांनी केली आहे. निसर्ग चक्र ीवादळाच्या तीव्रतेमुळे भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा व खांब पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे वीज वितरणचे शाखा अभियंता राहुल भगत यांनी सांगितले.कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु ळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल शेळके यांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाचा समावेश कणकोरी पाणी पुरवठा योजनेत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहेत. ग्रामस्थांनी पाण्याची बचत करु न महिलांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन सरपंच शेळके यांनी केले आहे. निसर्ग वादळाने भोजापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पोलचे नुकसान केले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरु ळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहनही सरपंच शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी