शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:48 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देभोजापूर खोरे। महिलांची पाण्यासाठी वणवण; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा तात्काळ सुरू करून पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी केली आहे. निसर्ग चक्री वादळाची तीव्रता लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीकडून सुमारे २० तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळामुळे परिसरासह भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा तसेच खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या योजनेवर आधारित असलेल्या पाच गावात दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. नांदुरशिंगोटे गाव परिसरात पिण्याच्या पाण्याचे इतर जलस्त्रोत नसल्याने नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिक धास्तावले असून कुठलेही पाणी पिण्यास धजावत नाही. त्यामुळे ही योजना तात्काळ सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाचही गावातील नागरिकांनी केली आहे. निसर्ग चक्र ीवादळाच्या तीव्रतेमुळे भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा व खांब पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे वीज वितरणचे शाखा अभियंता राहुल भगत यांनी सांगितले.कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु ळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल शेळके यांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाचा समावेश कणकोरी पाणी पुरवठा योजनेत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहेत. ग्रामस्थांनी पाण्याची बचत करु न महिलांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन सरपंच शेळके यांनी केले आहे. निसर्ग वादळाने भोजापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पोलचे नुकसान केले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरु ळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहनही सरपंच शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी