शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पाच हजार वन दावे स्वाक्षरीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:10 IST

भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत.

नाशिक : भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत. अधिकाºयांच्या या सुंदोपसुंदीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून वन हक्क दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थापित जिल्हास्तरीय समितीची एकही बैठक होऊ शकलेली नाही.केंद्र सरकारने केलेल्या वन हक्क कायद्याला आठ वर्षांचा कालावधी उलटला असून, वन खात्याच्या ताब्यातील जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाºया आदिवासीला त्या जमिनीचा ताबा देणाºया या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर वन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांत वन जमिनींचा ताबा असलेल्या आदिवासींकडून पुरावे व कागदपत्रांची तपासणी करून दावे मंजूर करण्याचे काम केले जात असून, तालुका पातळीवर प्रांत अधिकारी तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या आदेशान्वये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त आदिवासी आयुक्त,तर सदस्य म्हणून उप वन संरक्षक अधिकाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या उदासीनतेमुळे वन हक्क कायद्याचे काम रखडले असून, ते असेच आणखी काही वर्षे चालावे असे अधिकाºयांना वाटत असावे म्हणून की काय जिल्हाधिकाºयांनी या जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे अध्यक्षपदाचे आपले अधिकार अपर जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केले, परिणामी अपर जिल्हाधिकाºयांना जिल्हाधिकाºयांना अधिकार जरी प्रदान झाले असले तरी, अतिरिक्त आदिवासी आयुक्तव उप वन संरक्षक या दोघा समिती सदस्यांचा हुद्दा अपर जिल्हाधिकाºयांपेक्षाही वरचा आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी या दोन्ही अधिकाºयांना कोणत्याही सूचना वा आदेश देऊ शकत नाही हे वास्तव कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी स्वीकारले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारीपदी बसलेली व्यक्ती उप वन संरक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या वयाच्या तुलनेने अगदीच कमी असल्यामुळेही जिल्ह्णात वन हक्काचे दावे मंजूर करण्यासाठी उप वन संरक्षकांना आदेशित करण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाच हजार दावे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फक्त मंजुरीसाठी अधिकाºयांच्या स्वाक्षरीसाठी पडून आहेत.