शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाच हजार वन दावे स्वाक्षरीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:10 IST

भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत.

नाशिक : भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत. अधिकाºयांच्या या सुंदोपसुंदीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून वन हक्क दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थापित जिल्हास्तरीय समितीची एकही बैठक होऊ शकलेली नाही.केंद्र सरकारने केलेल्या वन हक्क कायद्याला आठ वर्षांचा कालावधी उलटला असून, वन खात्याच्या ताब्यातील जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाºया आदिवासीला त्या जमिनीचा ताबा देणाºया या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर वन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांत वन जमिनींचा ताबा असलेल्या आदिवासींकडून पुरावे व कागदपत्रांची तपासणी करून दावे मंजूर करण्याचे काम केले जात असून, तालुका पातळीवर प्रांत अधिकारी तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या आदेशान्वये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त आदिवासी आयुक्त,तर सदस्य म्हणून उप वन संरक्षक अधिकाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या उदासीनतेमुळे वन हक्क कायद्याचे काम रखडले असून, ते असेच आणखी काही वर्षे चालावे असे अधिकाºयांना वाटत असावे म्हणून की काय जिल्हाधिकाºयांनी या जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे अध्यक्षपदाचे आपले अधिकार अपर जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केले, परिणामी अपर जिल्हाधिकाºयांना जिल्हाधिकाºयांना अधिकार जरी प्रदान झाले असले तरी, अतिरिक्त आदिवासी आयुक्तव उप वन संरक्षक या दोघा समिती सदस्यांचा हुद्दा अपर जिल्हाधिकाºयांपेक्षाही वरचा आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी या दोन्ही अधिकाºयांना कोणत्याही सूचना वा आदेश देऊ शकत नाही हे वास्तव कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी स्वीकारले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारीपदी बसलेली व्यक्ती उप वन संरक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या वयाच्या तुलनेने अगदीच कमी असल्यामुळेही जिल्ह्णात वन हक्काचे दावे मंजूर करण्यासाठी उप वन संरक्षकांना आदेशित करण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाच हजार दावे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फक्त मंजुरीसाठी अधिकाºयांच्या स्वाक्षरीसाठी पडून आहेत.