शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आरटीई प्रवेशासाठी   पाच हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:41 IST

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील  ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ मार्चपर्यंत मुदत :  जिल्ह्यात ४ हजार ५४४ जागांवर प्रक्रिया

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील  ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६ तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८  विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत  जागा राखीव आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ५ हजार ७६ अर्ज प्राप्त झाले आहेत.  दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून  प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार  आहे.मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतिक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण