शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जुन्या नाशकातील पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:10 IST

नाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउद्रेक कायम । महापालिकेने नेमला ‘टास्क फोर्स’

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरात ४९ बाधित आढळल्याने रुग्णसंख्या अकराशेच्या पार गेली आहे, तर एकाच दिवसात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण जुने नाशिक परिसरातील होते. बुधवारपेठ भागातील एका ४५ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल १४ जून रोजी प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे कथडा येथील फकीरवाडी येथील महिलेचा ती बाधित असल्याचा अहवालदेखील १५ जून रोजी प्राप्त झाला होता, तर नानावली येथील ६५ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचा अहवाल १९ जून रोजी प्राप्त झाला होता. तसेच भद्रकाली फ्रुट मार्केट येथील महिला आणि कोकणीपुरा येथील ६५ वर्षीय वृद्धाचादेखील मृत्यू झाला आहे.मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून दखल घेऊन मृत्यूचा दर कमी करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून, तज्ज्ञांच्या सूचनांसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.रुग्ण शोधण्याची मोहीमदुसरीकडे जुने नाशिक, पंचवटीतील पेठरोड तसेच अन्य भागांतील फॅमिली फिजिशियन्स, होमीओपॅथी, युनानी तसेच अन्य पॅथीच्या स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला असून, त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे उपचार घेण्यासाठी रुग्ण येत आहेत, त्यांच्यात कोणती लक्षणे आढळली आहेत. याची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याआधारे येत्या सोमवारपासून (दि.२२) ज्ञात नसलेली परंतु लक्षणे असलेली सर्व रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ज्ञात नसलेले रुग्ण शोधण्यात येणार असून, दिवसाला किमान पाचशे स्वॅब घेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील एका लॅबकडून तीनशे स्वॅब तपासून दिले जाणार आहेत. याशिवाय टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.- डॉ. राजेंद्र त्र्यंबके,वैद्यकीय अधीक्षक, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य