शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जुन्या नाशकातील पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:10 IST

नाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउद्रेक कायम । महापालिकेने नेमला ‘टास्क फोर्स’

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरात ४९ बाधित आढळल्याने रुग्णसंख्या अकराशेच्या पार गेली आहे, तर एकाच दिवसात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण जुने नाशिक परिसरातील होते. बुधवारपेठ भागातील एका ४५ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल १४ जून रोजी प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे कथडा येथील फकीरवाडी येथील महिलेचा ती बाधित असल्याचा अहवालदेखील १५ जून रोजी प्राप्त झाला होता, तर नानावली येथील ६५ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचा अहवाल १९ जून रोजी प्राप्त झाला होता. तसेच भद्रकाली फ्रुट मार्केट येथील महिला आणि कोकणीपुरा येथील ६५ वर्षीय वृद्धाचादेखील मृत्यू झाला आहे.मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून दखल घेऊन मृत्यूचा दर कमी करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून, तज्ज्ञांच्या सूचनांसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.रुग्ण शोधण्याची मोहीमदुसरीकडे जुने नाशिक, पंचवटीतील पेठरोड तसेच अन्य भागांतील फॅमिली फिजिशियन्स, होमीओपॅथी, युनानी तसेच अन्य पॅथीच्या स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला असून, त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे उपचार घेण्यासाठी रुग्ण येत आहेत, त्यांच्यात कोणती लक्षणे आढळली आहेत. याची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याआधारे येत्या सोमवारपासून (दि.२२) ज्ञात नसलेली परंतु लक्षणे असलेली सर्व रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ज्ञात नसलेले रुग्ण शोधण्यात येणार असून, दिवसाला किमान पाचशे स्वॅब घेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील एका लॅबकडून तीनशे स्वॅब तपासून दिले जाणार आहेत. याशिवाय टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.- डॉ. राजेंद्र त्र्यंबके,वैद्यकीय अधीक्षक, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य