शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:21 IST

महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.

ठळक मुद्देधक्कादायक : कायदासुव्यवस्था धोक्यात; व्यावसायिकासह एक तरुणी, तीन तरुणांची हत्या

नाशिक : महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.नवे वर्ष उजाडले आणि आठवडा उलटत नाही तोच नाशिककरांच्या कानी इंदिरानगर भागात व्यावसायिकाच्या खुनाची घटना आली. ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या या परिसरात सहा लाखांची रोकड लुटून नेत एका मॉलच्या मालकाची संशयितांनी निर्घृण हत्या केल्याची गंभीर घटना घडली. पोलीस यंत्रणाही या घटनेनी तितकीच हादरली आणि तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, पंचवटी पोलीस ठाण्यांकडून या खुनाचा समांतर तपासाला गती दिली गेली. तपासाची चक्रे फिरत नाही तोच दुसऱ्या दिवशी दि. ९ जानेवारीला कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या टेरेसवर तरुणीचा मृतदेह गंगापूर पोलिसांना आढळून आला. १८ ते २० वयोगटांतील या तरुणीची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे तपासात उघड झाले. त्याच्या मुसक्या पंचवटी पोलिसांकडून आवळल्या गेल्या. या घटनेला चार दिवस पूर्ण होत नाही, तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजमाळ भागात क्षुल्लक कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून युवकाला मकरसंक्रांतीच्या रात्री ठार मारले.आत्येबहिणीच्या हळदीला आला असता तेथे टोळक्याचे भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्याने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागात टोळक्याने युवकाची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना रविवार, दि. २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. . या गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोच पुन्हा आठवडाभराने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सिडकोमधील गजबजलेल्या चौकात उभ्या असलेल्या एका युवकाला दोघांनी दुचाकीवरून येत भोसकल्याची घटना शुक्रवारी (दि.८) घडली.खूनसत्र सुरूच, पोलीस हतबल; गुन्हेगारी टोळ्याही अस्तित्वातशहरात महिनाभरात पाच खून झाले असून, जणू नव्या वर्षासोबत शहरात खूनसत्रास आरंभ झाला की काय? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. लागोपाठ शहरात खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककर चांगलेच धास्तावले आहेत. सातत्याने घडणाºया खुनाच्या घटना रोखण्याचे पोलीस आयुक्तालयापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.४शहरात केवळ खून सत्र सुरु आहे असे नव्हे तर भर रस्त्यात खुलेआम टोळीयुद्ध भडकल्याचे दिसते. गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात आल्याचे पोलीस सांगत असले तरी शहरातील अनेक भागात भाईगिरी करणाºया टवाळ्यांच्या टोळ््या स्थापन झाल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMurderखून