शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

उद्यापासून पाच दिवस पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:54 IST

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिलाआहे. पाटबंधारे खात्याने ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन पूर्ण केले असून, २५ ते ३१ आॅक्टोबर या दरम्यान एकाच वेळी तिन्ही समूहातून पाणी सोडण्यात येणार आहे.  त्यामुळे नदीद्वारे सोडल्या जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, असे कृत्य कोणी करू नये तसेच पाण्याचा अधिकृत व अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे खात्याने प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे. गोदावरी नदीवरील नांदूरमधमेश्वर बंधारे ते प्रवरा संगमादरम्यान असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयातील फळ्या काढून घेण्यात याव्यात. ज्यांनी पाणी अडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दारणा, गोदावरी, कादवा नदीतून ६ ते ८ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येणार असल्यामुळे नदीतील इंजिने, मोटारी व इतर साहित्य तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून घ्यावीत. पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाल्यास पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात उतरणे, पाण्याची चोरी करणे, पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे व रा. पा. भाट यांनी दिला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी