शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर सुरू

By admin | Updated: March 4, 2017 01:52 IST

नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना प्रशासनाने टंचाई कृती कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मंजूर करण्यात भेदाभेद चालविला आहे

नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अलीकडे वाढला असला तरी, कमी पर्जन्यमान झालेल्या ग्रामीण भागात जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना प्रशासनाने टंचाई कृती कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मंजूर करण्यात भेदाभेद चालविला आहे. दीड महिन्यापासून पाण्याची मागणी करणाऱ्यांना डावलून निव्वळ मंत्र्याच्या दबावापोटी मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे दोनच दिवसांत टॅँकर मंजुरीचे आदेश काढण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी, काही तालुक्यांमधील विशिष्ट भागाकडे त्याची वक्रदृष्टी कायम होती. तथापि, नदी, नाले व धरणांमधील पाण्याचा साठा पाहता ज्या ठिकाणी कमी पर्जन्यवृष्टी झाली त्या ग्रामीण भागात डिसेंबरपर्यंत सर्व आलबेल होते. मात्र जानेवारी महिन्यापासून बागलाण तालुक्यातील खिरमाणे व सादरे या दोन गावांना भीषण पाणीटंचाई भेडसावू लागल्याने ग्रामपंचायतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव गट विकास अधिकारी तसेच तहसीलदारांना सादर केला. या दोन्ही कार्यालयाने पाणीटंचाईची खात्री करून तसा अहवाल प्रांत कार्यालयाला दिला व प्रांत कार्यालयाने टॅँकर मागणीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाला नोंदविली. परंतु जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही टॅँकरची मागणी कशी होऊ शकते, असा सवाल जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला परिणामी ज्या गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागली त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणीटंचाईची खात्री करण्यासाठी थेट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याकडून अहवाल मागविला, त्यांनीही खिरमाणे, सादरे गावात पिण्याचा पाण्याचा कोणताही उद्भव नसल्याचे स्पष्ट केले असताना, प्रशासनाने त्यांच्यावरही अविश्वास दर्शवित, थेट भूजल सर्वेक्षण विभागाकडून संबंधित गावातील जमिनीखालील पाण्याचा अंदाज घेतला, त्यांनीही पातळी खोल गेल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर प्रशासनाचे समाधान झाले नाही. सरते शेवटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत मागविण्यात आले, हे मतदेखील टॅँकरने पाणीपुरवठा करण्याच्या बाजूनेच स्पष्ट झाले. तथापि, अद्यापही या दोन गावांना टॅँकर मंजूर झाले नाहीत. बागलाण तालुक्यातील रामतीर, राहुड व इजमाने या तीन गावांनाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु त्यांच्याही तोंडाला पाणी पुसण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पाणीप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांनीही प्रशासनाला अवगत करून पाण्याची मागणी केली असता, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.