शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असलेले जिल्ह्यातील पहिले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:30 IST

संजय दुनबळे । दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ ...

ठळक मुद्देगरीब विद्यार्थ्यांच्या दारात थांबते शाळेची बस

संजय दुनबळे ।दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी येथील सरपंच प्रयत्नशील असून, वेगवेगळ्या योजनांचा गावाच्या विकासासाठी वापर केल्याने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावात मिळत आहेत. येथील सरपंच नरेंद्र जाधव यांच्या नियोजपूर्वक आणि पारदर्शी कारभारातूनच हे शक्य झाले आहे. शासकीय योजना सर्व ठिकाणी सारख्याच असतात त्यांची जर प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर प्रत्येक गावात हे शक्य आहे. सरपंच नरेंद्र जाधव यांना यावर्षीचा राज्यस्तरीय लोकमत सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...आपल्या ग्रामपंचायतीने कोणती विशेष कामे केली आहेत ?जाधव - दिंडोरी तालुक्यातील अवनखेड सारख्या २८०० लोकवस्तीच्या छोट्याशा गावात आम्ही प्रथम मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला. पूर्वी गावात रस्तेही चांगले नव्हते. दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आज गावात सर्वत्र सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असून अंतर्गत रस्ते सीमेंट कॉँक्रीटचे असणारी तालुक्यातील आमची पहिली ग्रामपंचायत आहे. पूर्वी पाण्याची एकाच ठिकाणी सोय होती. महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत होती. ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. आज गावातील प्रत्येक घरासमोर पाणीपुरवठा योजनेचा नळ आहे. इतकेच नव्हे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरासमोर एक छोटी मोरी बांधून दिली असून, महिलांची धुणे-भांड्याची सोय तेथेच करून दिली आहे. गावात सर्वत्र भूमिगत गटारी बांधण्यात आल्या असून, त्यातून वाहणारे सांडपाणी शोषखड्ड्यांमध्ये जिरवले आहे. त्यामुळे गावात कोठेही रस्त्यांवर सांडपाणी वाहताना दिसत नाही. यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.प्रश्न - ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या ?जाधव - अवनखेड गाव परिसरात विविध कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना सुरुवातीला कर आकारणी खूपच कमी होती. त्यात सुधारणा करून आता शासनाच्या नियमाप्रमाणे कंपन्यांकडून कर आकारणी केली जाते. प्रसंगी कंपन्यांवर जप्तीची कारवाई करून सक्तीने कर वसुली केली जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. त्यामाध्यमातून गावात विकासकामे करण्यास मदत होते.प्रश्न - राज्यस्तरीय पुरस्काराबाबत काय सांगाल?जाधव - २००५ साली मी गावचा सरपंच झालो. ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यानंतर मी पैसा खाणार नाही आणि खाऊ देणार नाही हे सूत्र अंगीकारले आहे. यामुळे गेल्या १५ वर्षांत मी प्रसिद्धीसाठी एकही पुरवणी कुठल्या वर्तमानपत्राला दिलेली नाही. असे असतानाही ‘लोकमत’ सारख्या मोठ्या दैनिकाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरावर सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार देऊन माझा सन्मान केला, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.गावात प्राथमिक शाळेची इमारत बांधली आहे. इंग्लिश मीडियमसारखी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी ही इमारत असून, सीएसआर फंडातून शाळेसाठी एक बस घेतली आहे. श्रीमंतांप्रमाणेच आज गरीब विद्यार्थ्यांच्या दारातही शाळेची बस उभी राहाते. यामुळे दूरवरून शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. बस ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविली जात असल्यामुळे या विद्यार्थ्यांकडून अल्प फी घेतली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही परवडते. पूर्वी ३ ते ४ कि.मी.वरून विद्यार्थ्यांना पायी चालत शाळेत यावे लागत होते.

टॅग्स :interviewमुलाखत