शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील आग संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:58 IST

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले.

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद व दोन्ही कार्यालयांना एकाच वेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागते हे संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे.  कोल्हापूर फाटा येथील जलसंपदा विभागाच्या या दोन्ही कार्यालयांना आमदार गावित, गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. मुसळे व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी सोमवारी कार्यालयाची पाहणी केली. महावितरणचे पथक मंगळवारी येऊन पहाणी करणार असून, याबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  रविवारी पहाटे लागलेली आग संशयास्पद असल्याचे बोलले जात असून या आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह ३०० हून अधिक गठ्ठ्यातील हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन करणार असल्याचे आमदार गावीत यांनी यावेळी सांगितले.  दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या शौचालय व बाथरूम व कार्यालयप्रमुख यांच्या कक्षास आग का लागली नाही ? या ठिकाणी चौकीदार का नव्हते ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, भ्रष्टाचारची चौकशी होण्यासाठी काही समाजसेवकाकडून माहिती अधिकार कायदाअंतर्गत मागणी करण्यात येत असल्यामुळेच कागदपत्र जाळण्याची चर्चा रंगली आहे.  आमदार गावीत यांच्यासमवेत माकप सरचिटणीस मोहन  जाधव, हेमंत पाटील बाळासाहेब गांगुर्डे, टिनू पगार, काशिनाथ गायकवाड , दामू पवार रशीद शेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आगीत पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा या दोन वेगवेगळया उपविभागातील कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोल्यांना आग लागली कशी याबाबत शंका व कुशंका निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही उपविभागाच्या जळालेल्या खोलीमध्ये अंतर अधिक आहे शिवाय दोन्ही उपविभागाच्या कार्यालयामध्ये शौचालये असून फक्त कागदपत्राच्या खोलीला आग लागली दोन्ही प्रमुखांच्या कक्षाला आग लागली नाही.

टॅग्स :Fairजत्राJ.P. Gavitजे.पी. गावित