शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

डोंगरांना आग लावणे महागात पडणार

By श्याम बागुल | Updated: December 6, 2018 16:11 IST

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे.

नाशिक : शिकार व जंगल संपदा नष्ट करण्याच्या दृष्टीने आदिवासी भागात डोंगर, टेकड्यांना आगी लावण्याचे सातत्याने होणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, अशी आग लावणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी वन अधिका-यांना दिले आहेत.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चा-याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मात्र वन खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील चारा पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. डोंगर, टेकड्यांवर पावसाळ्याामुळे उगवलेले गवत आता सुकू लागले असून, शिकाºयांकडून ससा, हरणे, मोर आदी प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीसाठी या डोंगर, टेकड्यांना पेटवून देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच जनावरांसाठी उपयुक्त ठरणारा चारादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. सदरचा प्रकार रात्रीच्या वेळीच घडत असून, त्यामुळे आग लावणा-यांचा शोध घेणे मुश्कील होत आहे. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी या भागातच प्रामुख्याने अशाप्रकारे आगी लावण्याचा प्रकार घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी वन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन डोंगराना आगी लावणा-यांचा शोध घेण्याचा व त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आग लावणा-यांच्या शोधासाठी पथके स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :fireआगNashikनाशिक