शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरांना आग लावणे महागात पडणार

By श्याम बागुल | Updated: December 6, 2018 16:11 IST

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे.

नाशिक : शिकार व जंगल संपदा नष्ट करण्याच्या दृष्टीने आदिवासी भागात डोंगर, टेकड्यांना आगी लावण्याचे सातत्याने होणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, अशी आग लावणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी वन अधिका-यांना दिले आहेत.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चा-याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मात्र वन खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील चारा पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. डोंगर, टेकड्यांवर पावसाळ्याामुळे उगवलेले गवत आता सुकू लागले असून, शिकाºयांकडून ससा, हरणे, मोर आदी प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीसाठी या डोंगर, टेकड्यांना पेटवून देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच जनावरांसाठी उपयुक्त ठरणारा चारादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. सदरचा प्रकार रात्रीच्या वेळीच घडत असून, त्यामुळे आग लावणा-यांचा शोध घेणे मुश्कील होत आहे. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी या भागातच प्रामुख्याने अशाप्रकारे आगी लावण्याचा प्रकार घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी वन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन डोंगराना आगी लावणा-यांचा शोध घेण्याचा व त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आग लावणा-यांच्या शोधासाठी पथके स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :fireआगNashikनाशिक