शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 01:10 IST

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. 

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी उपाययोजना निष्काळजीपणा करणाऱ्यांवर  कारवाई होणार

नाशिक : लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. पालकमंत्री छगन भुजबवळ यांनी रविवारी दुपारी भुजबळ फार्म येथे कोरेाना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगितले. विनामास्क फिरल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या.गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्ण संख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १७३१ पर्यंत पोहचली.  मागील पाच दिवसात तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीत असंख्य लोक विनामास्क फिरत असतात. कोरोनाचे भय बाजूला सारुन बाजारपेठेतही विनामास्क फिरणाऱ्यांनी गर्दी दिसते. मास्ककडे झालेले दुलर्लक्ष आणि त्यामुळेच रुग्न संख्या वाढत असल्याने नाशिककरांना आता मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. विनामास्क आढळल्यास महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत आदी उपस्थित होते.केवळ १०० व्यक्तींनाच परवानगीलग्न सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी येथून पुढे केवळ १०० व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्यांचा लग्नसोहळा आहे त्यांना याबाबत पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. गोरजमुहुर्तावर लग्नसमारंभात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन मंडप व लॉन्स मालकांनादेखील याबाबतची समज दिली जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचनापालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी, सर्व आस्थापना, समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.गोरज मुहूर्तावरील लग्नांवर येणार निर्बंधगोरज मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्याला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अशा मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर आता पोलिसांची नजर राहाणार आहे.  शक्यतो दुपारी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारंभ असा कार्यक्रम मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत करण्याचा सल्लादेखील भुजबळ यांनी नाशिककरांना दिला. लग्न सोहळ्यासाठी यापुढे केवळ शंभर जणांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याChhagan Bhujbalछगन भुजबळ