शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांना शोधाच, पण खुद्दारांना काय दिले हेही तपासा!

By किरण अग्रवाल | Updated: June 9, 2019 13:16 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गद्दारीचा विषय उपस्थित झाला खरा; पण त्यांची नावे जाणून घेऊन कारवाई केली जाणे शक्य आहे का? कारण यात नेत्यांच्या डाव्या-उजव्या बाजूस राहणारेच अधिक असू शकतात. त्यापेक्षा प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेतली जाणे गरजेचे ठरावे.

ठळक मुद्दे  निष्ठावान कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षापक्षाच्या काही पदाधिका-यांनीच घात केल्याच्या तक्रारी पक्षाकडून सारे लाभ मिळवूनही गद्दारी केल्याचा संशय

सारांशपराभवाच्या कारणांचा शोध घेऊन आढळून येणाऱ्या उणिवा दूर करणे कुणाही पराभूतांसाठी गरजेचेच असते, त्याखेरीज नव्या लढाईकरिता सिद्ध व सज्ज होता येत नाही. पण, तसे करताना व विशेषत: उणिवांचे कारक घटक शोधून त्यांची वेगळी दखल घेताना निष्ठेने काम करणाऱ्यांच्या पदरात आजवर कोणत्या संधीचे माप टाकले गेले याची चिकित्सा घडून येणे टाळता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गद्दारांचा शोध घेऊ पाहणा-या छगन भुजबळ यांनाही सदर बाब दुर्लक्षिता येऊ नये.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने विजयाची खात्री बाळगल्या जाणा-या नाशिक व दिंडोरीच्याही जागेवर पराभव पत्करावा लागल्याने आता त्यामागील कारणांचा शोध सुरू झाला आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिका-यांची बैठक झाली असता, पक्षाच्या काही पदाधिका-यांनीच घात केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर गोपनीयतेची खात्री देत, अशा गद्दार नेत्यांची नावे बंद पाकिटातून आपल्याला कळविण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. अर्थात याच निवडणुकीत नव्हे, तर गेल्याही वेळी फंदफितुरी कुणी कुणी केली हे भुजबळांसारख्या राजकारणातील मुरब्बी नेत्याच्या नजरेत आले नसावे, असे समजता येऊ नये. यंदा तर कार्यकर्त्यांनी आरोप केला त्याप्रमाणे खरेच काहींनी विरोधी उमेदवाराच्या समर्थनार्थ भोजनावळी उठविल्याचे, तर काहींनी व्यासपीठीय हजेरीखेरीज पक्षाचा प्रचार न करता उलट विरोधकांना रसद पुरविल्याचे उघडपणे बोलले जात आहे. तेव्हा, या बाबी खुद्द भुजबळांना ज्ञात नसाव्यात का? हा यातील खरा प्रश्न ठरावा.मुळात, ज्यांची नावे प्राप्त होणार ते गद्दार गणले जाणार; पण ज्यांनी पक्षाच्या बळावर भरपूर काही उपभोगूनही तटस्थता राखली त्यांचे काय? कारण, मोदींच्या त्सुनामीमुळे पराभव झाला हेच मान्य करता येणारे पूर्ण सत्य असले तरी, एवढ्या मोठ्या फरकाने तो व्हावा हे पक्षाची कमजोरी अधोरेखित करून देणारे आणि गद्दारीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करणारेही आहे. तेव्हा ही कमजोरी कुठे व कशात शोधणार? खुद्द भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात २८ हजारांहून अधिक, तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघात ७० हजारांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार मागे पडला. मग तेथील पक्ष पदाधिकारी व भुजबळ समर्थकांकडे काय म्हणून बघणार? तेव्हा गद्दार शोधणे सोपे असले किंवा ते समोर दिसत असले तरी त्यांच्यावर कारवाई करणे आजघडीला शक्य होणार आहे का? कारण तसाच पक्ष खिळखिळा झालेला असताना असे करून पुन्हा तो अडचणीत आणणे आत्मघातीच ठरू शकणारे आहे.तेव्हा, हे सारे अवघडच आहे. त्यामुळे ते करता येईल की नाही, हा नंतरचा विषय; पण एक मात्र नक्की व्हावे, ते म्हणजे गद्दारांना शोधतानाच ज्यांनी खुद्दारीने पक्षकार्य केले त्यांना पक्षाने अगर भुजबळ यांनी काय दिले याचे चिंतन! कारण खरी मेख तिथेच आहे. ज्यांना एकापेक्षा अधिक वेळा सत्तापदांची संधी दिली, ज्यांना विविध कामांची कंत्राटे देऊन भरभराटीस आणून दिले, त्यांनीच त्यांचे काम दाखवून दिल्याची उदाहरणे समोर आहेत; पण चहापाण्याच्या खर्चाची मारामार असलेले कार्यकर्ते मात्र पदरमोड करून पक्षासाठी झुंजल्याचे वेळोवेळी दिसून आले असताना आजवर त्यांच्याकडे लक्षच दिले गेले नाही, हे नाकारता न येणारे सत्य आहे. दुर्दैव असे की, पक्षाकडून सारे लाभ मिळवूनही गद्दारी केल्याचा संशय असणारेच नेत्यांच्या उजव्या व डाव्या हाताशी असलेले आढळून येतात आणि समोर सतरंजीवर बसलेल्या प्रामाणिकांना कारवायांचे इशारे ऐकवले जातात. म्हणजे जनाधार न उरलेले व्यासपीठावर आवतीभोवती मिरवतात व लोकांमध्ये जाऊन काम करणारे सतरंजीवरच राहतात, अशी ही अवस्था आहे. ती बदलून प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यास ताकद दिली जाणार आहे का, हा खरा मुद्दा आहे. सारे काही मिळूनही ज्यांचे पोट कधी भरत नाही अशांच्याच ताटात पुन्हा पुन्हा वाढले जाऊनही तेच पक्षाशी द्रोह करतात हे जाणूनही अशा गद्दारांकडे दुर्लक्ष केले जाणार असेल तर कार्यकर्त्यांकडून चिठ्ठ्या मागवण्यात काय अर्थ? अर्थात अजून वेळ गेलेली नाही. पराभवाने खचून न जाता उलट अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. ते करताना पक्ष-संघटनेत फेरबदलाचे संकेतही दिले आहेत. तेव्हा तोंडदेखले समर्थन दर्शवून परागंदा होणाºयांना संधी द्यायची की निष्ठावंतांना; याचा फैसला आता गरजेचा ठरावा. तोच पक्षाला चांगले दिवस आणू शकतो, अन्यथा काही खरे नाही!

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी