शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कोविडमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:15 IST

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, शेतीमालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेतीमाल बेभावात विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच इतर फळे माल शेतातच सडला आहे.खरीप हंगाम अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, भरवीर बु., साकूर, पिंपळगाव, घोटी बु. परिसरात शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.एकीकडे शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच मोडकळीस निघालेली शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खतांच्या दरवाढीमुळे पुरती कोलमडली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रतिबॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसणार आहे.- सचिन सहाणे, शेतकरी, साकूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी