शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटींची आर्थिक मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:36 IST

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध कार्यकारी विकास सोसायटी फेडरेशन, शेतकरी व ठेवीदारांच्या संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध कार्यकारी विकास सोसायटी फेडरेशन, शेतकरी व ठेवीदारांच्या संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँक २०१७ पासून अडचणीत आली असून, शेतकºयांनी विकास सोसायटीत पीककर्ज भरले; मात्र त्यांना पुन्हा पीककर्ज मिळाले नाही. त्यानंतर नोटाबंदीने बँक अडचणीत आली. शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली; मात्र त्यात २०१६ मधील कर्जाचा समावेश केला नाही. शासनाने कर्जमाफी संदर्भात व्याप्ती वाढविण्याचा व पती-पत्नी वैयक्तिक खातेदार घटक करू असे जाहीर केले होते; परंतु गेल्या दोन वर्षात सरकार कर्जमाफी करू शकले नाही, परिणामी शेतकरी कर्जमुक्तीची वाट पाहत आहे.जिल्हा बँक ठेवीदारांना ठेवी परत करू शकत नाही आणि कर्ज वसुलीही होत नाही. जिल्हा बँक शेतकºयांची शेती जप्त करून लिलाव करीत आहे. सरकार उद्योगपतींना उद्योग अडचणीत आला तर त्यांना अधिक मदत करून उद्योग सुरू राहण्यासाठी मदत करते; मात्र शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असताना त्याला मदत केली जात नाही.निवेदन देतेवेळी राजेंद्र डोखळे, राजू देसले, संपतराव वक्ते, विष्णुपंत गायधनी, उत्तम खांडबहाले, भास्कर शिंदे, नामदेव बोराडे आदी उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी पीककर्ज भरले आहे त्यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा तसेच ठेवीदारांना हक्काची ठेव परत मिळण्यासाठी जिल्हा बँक चालू होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हमी घेऊन शिखर बँकेकडून अडीच हजार कोटींचे कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, जिल्हा बँकेने शेतीचा लिलाव त्वरित थांबवून शेती भाड्याने खंडाने देण्याचा लिलाव करावा. अकृषक कर्जदारांवर, संस्थांची त्वरित वसुली करण्यात यावी, मुदत ठेवी कर्ज रूपांतर चालू ठेवावे, गावपातळीवर कार्यरत विका सोसायट्या वाचविण्यासाठी शेतकºयांना गावात कर्जपुरवठा सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिक