शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:29 IST

खडकी:  कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार

खडकी:  कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात हुरड्याला खूप महत्त्व होते त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कृषी पर्यटन विकासाला या योजनेच्या माध्यमातून विकसित केल्यास शेतकºयांच्या आशा पल्लवित होणार आहेत कारण कृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत देश ग्रामीण भागात वसलेला आहे ग्रामीण भागातील लोकांचे प्रथम व्यवसायाचे साधन शेती आहे. या शेतीतून शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच इतरही लोकांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादनात निर्माण निर्मिती करतो. मात्र ही निर्मिती करीत असताना शेती बेभरवशाची मानले जाते. व्यवसायिक शेती म्हणून शेतकरी शेतीकडे पाहिले तर पावसावर आधारित शेती आपल्या देशात आहे. या शेतीला वाव मिळण्यासाठी शेतीवर आधारित शेतमालाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील या उद्योगाच्या उत्पादनाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी कृषी पर्यटन योग्य मार्ग आहे .त्या अनुषंगाने शासनाने चांगली पावले उचलली आहेत. यापूर्वी कृषी पर्यटन धोरणाला उद्योगाचा दर्जा देऊन शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी शेतकºयांच्या उत्पादनाला पूरक उद्योगाचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासाठी शेतातील विकणाºया उत्पादनाची चौकशी करून त्यावर आधारित उद्योगात शोधण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी आधारित व्यवसायाची संशोधन करण्यासाठी धजावले गरजेचे आहे. यातूनच शेतकºयांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. कृषी पर्यटन धोरण विकसित करण्यासाठी ग्रामीण भागातील हुरडा पार्टी या कल्पनेला मूर्त रूप देऊन हा शेतकºयांच्या बाजरी ज्वारी गहू हरभरा मका तुरीच्या ओल्या शेंगा आदी उत्पादनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. व त्यातून मिळणाºया उत्पादनाच्या आर्थिक बाजू मिळेल शेतकरी सक्षम होणार आहे. यासाठी विशेष अनुदान योजना सुरू करणे गरजेचे आहे .शेतकºयांच्या कुटुंबाला किंवा त्याच्या कुटुंबातील रोजगाराला अनुदान देऊन हुरडा पार्टीसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित करणे कृषी पर्यटन धोरण यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठे मॉल उभारून तेथे हुरडा पार्टी आयोजित करणे यासाठी चे कार्यक्रम निर्माण करणे त्यातूनच रोजगारही उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती