शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:29 IST

खडकी:  कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार

खडकी:  कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात हुरड्याला खूप महत्त्व होते त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कृषी पर्यटन विकासाला या योजनेच्या माध्यमातून विकसित केल्यास शेतकºयांच्या आशा पल्लवित होणार आहेत कारण कृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत देश ग्रामीण भागात वसलेला आहे ग्रामीण भागातील लोकांचे प्रथम व्यवसायाचे साधन शेती आहे. या शेतीतून शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच इतरही लोकांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादनात निर्माण निर्मिती करतो. मात्र ही निर्मिती करीत असताना शेती बेभरवशाची मानले जाते. व्यवसायिक शेती म्हणून शेतकरी शेतीकडे पाहिले तर पावसावर आधारित शेती आपल्या देशात आहे. या शेतीला वाव मिळण्यासाठी शेतीवर आधारित शेतमालाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील या उद्योगाच्या उत्पादनाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी कृषी पर्यटन योग्य मार्ग आहे .त्या अनुषंगाने शासनाने चांगली पावले उचलली आहेत. यापूर्वी कृषी पर्यटन धोरणाला उद्योगाचा दर्जा देऊन शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी शेतकºयांच्या उत्पादनाला पूरक उद्योगाचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासाठी शेतातील विकणाºया उत्पादनाची चौकशी करून त्यावर आधारित उद्योगात शोधण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी आधारित व्यवसायाची संशोधन करण्यासाठी धजावले गरजेचे आहे. यातूनच शेतकºयांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. कृषी पर्यटन धोरण विकसित करण्यासाठी ग्रामीण भागातील हुरडा पार्टी या कल्पनेला मूर्त रूप देऊन हा शेतकºयांच्या बाजरी ज्वारी गहू हरभरा मका तुरीच्या ओल्या शेंगा आदी उत्पादनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. व त्यातून मिळणाºया उत्पादनाच्या आर्थिक बाजू मिळेल शेतकरी सक्षम होणार आहे. यासाठी विशेष अनुदान योजना सुरू करणे गरजेचे आहे .शेतकºयांच्या कुटुंबाला किंवा त्याच्या कुटुंबातील रोजगाराला अनुदान देऊन हुरडा पार्टीसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित करणे कृषी पर्यटन धोरण यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठे मॉल उभारून तेथे हुरडा पार्टी आयोजित करणे यासाठी चे कार्यक्रम निर्माण करणे त्यातूनच रोजगारही उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती