शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

...अखेर जोरदार बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:27 IST

शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.दोन दिवसांपासून नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिकरोड परिसरात मात्र दुपारी साडेतीन वाजेपासून पावसाच्या सरींचा वर्षाव होऊ लागला होता. चार वाजेपासून पावसाने जोर धरला.शहरातदेखील साडेचार वाजेपासून जोरदार जलधारा कोसळू लागल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. जोरदार पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीची धूळधाण उडविली. सर्वच गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पुन्हा पहावयास मिळाले. तसेच राजीव गांधी भवनपुढे शरणपूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोडवरील व्यावसायिक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये पाणी साचले़ स्टेडियम कॉम्प्लेक्समध्येही पाण्याचे तळे साचले होते़धरण क्षेत्रात पावसाचा दिलासा४सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण क्षेत्रात ३८, कश्यपी क्षेत्रात १७, अंबोली पाणलोट क्षेत्रात १७ मि.मी. इतका पाऊस पडला. मात्र गौतमी धरण परिसरात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबक परिसरातील पाणलोट क्षेत्रात केवळ ७ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली. अद्याप गंगापूर धरण क्षेत्रात यापूर्वी पावसाने अशी दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सोमवारी धरण क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.वाहतूक कोंडीमुळे हालसाडेपाच वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन सायंकाळच्या वेळेस पावसाच्या दमदार सरींचा जोरदार वर्षाव सुरू झाला. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. परिणामी कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी, त्र्यंबक नाका, द्वारका, मुंबई नाका, काठेगल्ली सिग्नल या भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवार कारंजा परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याने मालेगाव स्टॅन्डपासून अहल्यादेवी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी