शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर जोरदार बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:27 IST

शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.दोन दिवसांपासून नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिकरोड परिसरात मात्र दुपारी साडेतीन वाजेपासून पावसाच्या सरींचा वर्षाव होऊ लागला होता. चार वाजेपासून पावसाने जोर धरला.शहरातदेखील साडेचार वाजेपासून जोरदार जलधारा कोसळू लागल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. जोरदार पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीची धूळधाण उडविली. सर्वच गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पुन्हा पहावयास मिळाले. तसेच राजीव गांधी भवनपुढे शरणपूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोडवरील व्यावसायिक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये पाणी साचले़ स्टेडियम कॉम्प्लेक्समध्येही पाण्याचे तळे साचले होते़धरण क्षेत्रात पावसाचा दिलासा४सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण क्षेत्रात ३८, कश्यपी क्षेत्रात १७, अंबोली पाणलोट क्षेत्रात १७ मि.मी. इतका पाऊस पडला. मात्र गौतमी धरण परिसरात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबक परिसरातील पाणलोट क्षेत्रात केवळ ७ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली. अद्याप गंगापूर धरण क्षेत्रात यापूर्वी पावसाने अशी दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सोमवारी धरण क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.वाहतूक कोंडीमुळे हालसाडेपाच वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन सायंकाळच्या वेळेस पावसाच्या दमदार सरींचा जोरदार वर्षाव सुरू झाला. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. परिणामी कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी, त्र्यंबक नाका, द्वारका, मुंबई नाका, काठेगल्ली सिग्नल या भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवार कारंजा परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याने मालेगाव स्टॅन्डपासून अहल्यादेवी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी