शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गोदाकाठ भागातील पंधरा गावे चार दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 15:26 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.चार दिवसांपूर्वी गोदाकाठ भागात जोरदार वादळ आले होते, पावसाने हजेरी लावली होती. या वादळात करंजगाव भागात विजेचे खांब पडले, तेव्हापासून म्हाळसाकोरे, औरंगपूर सबस्टेशन अंतर्गत येणारे भेंडाळी, म्हाळसाकोरे, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, शिंगवे, गोदानगर, शिंगवे, सोनगाव, बागलवाडी, औरंगपूर, तळवाडे, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भुसे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.चार दिवसांपासून सर्व गावे अंधारात आहेत. या भागातील बहुतांशी नागरिक वस्तीवर राहतात. शेतातील विहिरीतून पंपाच्या साहाय्याने पाणी काढून पिण्यासाठी वापरतात जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याशिवाय माणसे आणि जनावरे मेटाकुटीला आली आहेत.वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असले तरी सलग चार दिवस वीज पुरवठा सुरु होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या ठिकाणी नवीन काम उभे करायचे असल्यास ठेकेदार एका दिवसात शेकडो फूट अंतररावर वीज उभी करतात, मोठाले खांब उभे करतात. त्यात नफा असतो पण इथे कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होणार नसल्याने ठेकेदार मनात येईल तेव्हा आणि हळुवार काम करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.---------------------यंदाचा पहिलाच पाऊस आला आणि वीजेचे खांब पडले, वादळ येण्यापूर्वी आणि पावसाळा सुरु होण्याअगोदर संभाव्य कामे केली असती तर आज सलग चार दिवस वीज पुरवठा खंडित राहाण्याची वेळ आली नसती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.- रवींद्र देविदास खालकर, भेंडाळी

टॅग्स :Nashikनाशिक